Wheat Sowing |गहू पिकासाठी ओलीत व्यवस्थापन

Wheat sowing in marathi:

Wheat sowing:भारतातील पिकांमध्ये गव्हाची बाजारपेठ खूप मोठ्या प्रमाणात असून जागतिक बाजारपेठेत भारताचा गव्हाच्या उत्पादनात दुसरा क्रमांक लागतो.११२.३२ मिलियन टना पर्यंत भारतामध्ये गव्हाचे उत्पादन घेतले जाते.३५.१५ क्विंटल प्रती हेक्टर गहू देशात उत्पादित केला जातो.परंतु महाराष्ट्रातील उत्पादकता बघितल्यास इतर राज्याच्या तुलनेत अत्यंत कमी असल्याचे सतत आढळून आले आहे.Wheat sowingमहाराष्ट्रातील शेतकऱ्यांना गहू उत्पादन वाढीसाठी शास्त्रोत्र पद्धतीने पेरणी, वाणांची निवड, लागवड पद्धती व खत व्यवस्थापन यांचे शास्त्रोत्र मार्गदर्शन शेतकऱ्या पर्यंत पोहचवणे हेच आमचे ध्येय आहे, या पद्धतीचा शेतकरी वर्गाने अवलंब केल्यास महाराष्ट्राची गहू उत्पादनात निश्चितच वाढ होईल.

ड्रोन फवारणी

wheat sowing

हेही वाचा:हरभरा घाटे अळीचे व्यवस्थापन

सर्वप्रथम मातीचे परीक्षण करणे गरजेचे आहे.मातीतील परीक्षण केल्यावर आपल्याला मातीतील जीवन द्रवे,आद्रतेचे प्रमाण,नत्र,स्फुरद,पालाश,त्याच प्रमाणे सामू,चुनखडीचे प्रमाण तसेच सुश्म अन्नद्रव्याचे प्रमाण इत्यादी बाबी सामाजायला मदत होते,रासायनिक खतांची मात्रा सुनिचीत करता येतात.

  • गहू पिकांसाठी पेरणीच्या वेळी सर्वप्रथम रासायनिक खताची मात्रा द्यावी यासाठी पुढील उपाय करावा : (नत्र १२०किलो + स्फुरद ६०किलो +६०किलो पलाश) प्रती हेक्टर देणे गरजेचे आहे.
  • पेरणीची वेळ बागायती किवा उशीरा झाली असल्यास गहू पिकास अर्धी मात्रा नत्राची आणि स्फुरद व पलाश यांची पूर्ण मात्रा देणे आवश्यक आहे.(पेरणीवेळी)
  • पेरणीनंतर २१ दिवसांनी नत्राची उर्वरित मात्रा द्यावी.
  • जर तुम्ही कोरडवाहू गहू पेरणी करत असाल तर नत्र व स्फुरद यांची पूर्ण मात्रा म्हणजे ४० किलो नत्र व २० किलो स्फुरद प्रतीहेक्टर पेरणीसोबतच देणे गरजेचे आहे.
  • कोरडवाहू पेरणी करताना काही गोष्टी आवर्जून लक्षात ठेवाव्यात. कोरडवाहू गव्हास नत्र विभागून देण्याचे टाळावे जर तुमच्याकडे पाण्याचे व्यवस्थापन मर्यादित असेल तर ६० किलो नात्र व ३०किलो स्फुरद एवढेच खाते पेरणी सोबत प्रतीहेक्टर द्यावे

Wheat sowing गहू पिकांविषयी माहिती:पिकांच्या माहिती साठी ज्या प्रमाणे जीवन द्रवे /हरित द्रव्याचे गरज असते त्याच प्रमाणे नत्र, स्फुरद, पलाश ,सुश्म व दुय्यम अन्नद्रव्याची देखील सर्वाधिक गरज असते, वाढता रासायनिक खताचा वापर,मिश्र पिकांचा अभाव,वेगवेगळ्या पिकांच्या वाणांचा वापर सेंद्रिय खतांचा अभाव,रासायनिक खतांची मात्रा असंतुलित असणे इत्यादी कारणांमुळे जमिनीतील पोषक द्रवे म्हणजेच सुक्ष्म अन्नद्र्व्यची मात्रा ढासळली असल्याचे दिसून येत आहे.पिकांच्या वाढीसाठी सुश्म अन्नद्रव्याचा पुरवढा शास्त्रोत्र पद्धतीने केल्यास पिक उत्पादनासाठी याचा हमखास फायदा होतो.

सुक्ष्म अन्नद्रव्याचे कार्य पिकवाढीसाठी अत्यंत मोलाचे आहे. पिक वाढीसाठी लागणारे घटक सुक्ष्म अन्नद्रव्यात असतात.त्यासाठी दुसरा कुठलाही पर्याय नाही हे लक्षात घेणे गरजेचे आहे.

Wheat sowing पिकांची जीवनचक्रे हि वेगवेगळ्या घटकावर अवलंबून असतात.पिके जशी प्रकाश संश्लेषनातून उर्जा घेतात.त्याच प्रमाणे प्रकाश संश्लेषनाची प्रक्रियेला गती देण्याचे काम सुश्म अन्नद्रावे करत असतात हि एक पिकांची जीवनचक्री आहे त्यामुळे पिकांसाठी सुश्म अन्नद्रव्यचे व्यवस्थापन करणे बंधनकारक आहे.मुख्य अन्न द्रव्या इतकीच सुश्म अन्न द्रव्याची गरज पिकांना असते.

पिक वाढीसाठी मॅंगनीज,लोह,तांबे,जस्त,क्लोरीन आणि निकेल या अन्न्द्रवाची अल्प प्रमाणात आवश्यकता असते.म्हणूनच यांना सुश्म अन्नद्रव म्हटले जाते.दुय्यम अन्नद्रव्या मध्ये माग्नेशिय्म, कॅल्शियम,गंधक यांचा समावेश होतो.

सुश्म अन्नद्रव्याचे फायदे:

Wheat farming

१) पिकांना रोगाची लागण लवकर होत नाही, पानांन मध्ये हिरवळ टिकून राहते.

२) पिकांचे उत्पादन वाढीस लागते. प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया जलद होते, पिके वाढीस लागतात.

३) दाण्यचे प्रमाण वाढते

४)जीवाणूचे प्रमाण जलद गतीने वाढते.

५) किंडा व रोगांपासून पिकाचे संरक्षणास मदत होते.

Wheat sowing शेतकरी बंधुनो, महाराष्ट्रातील जमिनीचा विचार केल्यास सुश्म तसेच मुख्य अन्नद्रव्याची कमतरता दिसू लागली आहे. वरील सांगितलेल्या कारणांमुळे हि कमतरता असल्याचे संशोधनात स्पष्ट झाले आहे.यामध्ये प्रामुख्याने जस्ताची महाराष्ट्रातील ३७% शेत्रात कमतरता असल्याचे आढळले.त्याच प्रमाणे दुय्यम अन्नद्रव्याची कमतरता देखील निदर्शनास आली आहे यात प्रामुख्याने लोह व बोरॉन यांचा समावेश होतो.

जस्त :

Wheat farming मध्ये, मुख्य सुश्म अन्नद्रव्या मध्ये जस्ताचा समावेश होतो. भारतातील राज्यान मध्ये जस्ताचे प्रमाण कमी होत असून त्याची लागण महाराष्ट्राला देखील होत आहे.भात व गहू ज्या ठिकाणी घेतली जातात त्या ठिकाणी जस्ताची कमतरता दिसू लागली आहे.शेतकरी वर्गाने अभ्यासात्मक पद्धतीने हा विषय हाताळण्याची गरज आहे.

जस्ताची कमतरतेमुळे होणारे परिणाम:

१) पिकांमध्ये जस्ताची कमतरता असल्यास पाने लहान, निमुळती व अरुंद येतात.

२) पिकांची पाने लहान त्याच बरोबर शिरामधील भागात पिवळसरपण येतो.

३) पिकांची पाने गळण्यास सुरवात होते.

४) पिके वाढीस लागत नाही.

५) पिकांची कार्यक्षमता मंदावते,पिके फुलांवर व परिपक्व होण्यास जास्त वेळ घेतात.

जस्ताच्या कमतरतेवरील उपाय:

जस्ताचे मातीतील प्रमाण जाणण्यासाठी माती परीक्षण करणे करणे गरजेचे आहे.जस्ताचे प्रमाण कमी आढळल्यास पुढील उपाय करावा:

(झिक सल्फेट ०.५% या द्रावणाची पेरणीच्यावेळी २ ते ३ वेळा फवारणी करावी) किवा पेरणीवेळी झिंक सल्फेट १७ -१८ किलो खतांबरोबर पेरावे)

सुश्म व दुय्यम अन्नद्रव्य प्रकल्पा अंतर्गत महत्वाच्या सूचना संशोधकांनी दिल्या आहे. त्यानुसार शेतकरी वर्गाने त्याचा अवलंब करून पिकांना संतुलित खाते देण्याचा प्रयत्न करावा. फवारणीचे वेळापत्रक सुनिचीत कराव्या. जमिनीतून सुश्म अन्द्रव्यचा वापर करावा किमान ३ ते ४ वर्षांनी हा प्रयोग करावा.माती परीक्षनातून लक्षात आलेल्याच सुश्म अन्नद्र्व्याचा वापर करावा .

गहू पिकाचे ओलीत व्यवस्थापन:

Wheat crop irrigation गहू पिकासाठी ओलीत व्यवस्थापन गहू उत्पादन घेत असताना सर्वात महत्वाचा टप्यावर आपण येऊन पोहचलो आहोत.गव्हाचे पिक ओलिताच्या व्यवस्थापनेवर अवलंबून असते.यातूनच उत्पादनात वाढ करता येते. किमान २० -२१ दिवसाच्या अंतराने गव्हाला ओलीत करावे.पिक वाढीत असताना पिके नाजूक असतात त्यामुळे पाण्याचा तान पिकांना बसणार नाही याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

गव्हाचे पिक नाजूक असताना म्हणजेच वाढीच्या अवस्थेत ओलिताचे व्यवस्थापन पुढील तक्त्या नुसार करावे:

पिक वाढीच्या अवस्था पेरणी नंतरचे दिवस ओलीत न केल्यास उत्पन्नात होणारी घट
१)मुळे फुटण्याची अवस्था १९-२० ३१ %
२)सर्वाधिक फुटची अवस्था ३१ -३६ १२%
३)कांडी धरण्याची अवस्था(उशिरा) ४६ -५१ १२%
४)फुलोरा अवस्था ६५ -६७ २७%
५)दाण्याची दुधाळ अवस्था ८३ -८५ ८.२%
६)दाण्यात चिक भरण्याची अवस्था ९५ -१०० २.२ %

ओलीत व्यवस्थापन मर्यादित असल्यास पुढील प्रमाणे ओलीत करावे:

Wheat crop irrigation

१) एकदाच ओलीत करू शकत असाल तर : ४३ दिवसांनी करावे

२) दोनदा ओलीत करू शकत असाल तर : २२-६५ दिवसांनी करावे

३) तीनदा ओलीत करू शकत असाल तर :२२,४४,६६ दिवसांनी करावे

शेतकरी बंधूनी, पेरणी पद्धत शास्त्रोत्र केल्यास त्याच बरोबर योग्य वाणांची निवड,सुधारित लागवड,खतांचा नियोजित वापर आणि ओलीत व्यवस्थापन वरील पद्धती नुसार केल्यास.गव्हातून उत्पन्न वाढीस निश्चितच फायदा होईल.

Visit कृषी विभाग Website