Vegetable Crop Management In Marathi:
Vegetable Crop Management: हलक्या ते मध्यम जमिनीत सर्वसाधारण पणे भाजीपाला पिकांची लागवड केली जाते.भाजीपाला पिकांच्या लागवडी साठी कमीतकमी पाण्याची उपलब्धता असली तरी पिके घेता येतात.गरजेचे असते त्यामळे कमी पाण्याची उपलब्धता असलेल्या शेत्रात शेवगा,गवार,हदगा,पालेभाज्या इत्यादी.भाजीपाला पिकांची शेतकरी बंधूनी निवड करावी. भाजीपाला पिकांची निवड करण्याआधी शेतकरी बंधूनी पाण्याची उपलब्धतेनुसार भाजीपाला पिकांची निवड करावी.भाजीपाला पिकांची निवड करताना पिकांचा कालावधी,पिकांवर येणारे रोग व किडींच्या व्यवस्थापनाचा जाणीवपूर्वक अभ्यास करावा.Vegetable Crop Management भाजीपाला पिकांचे व्यवस्थापन करताना मिश्र भाजीपाला पिकांची निवड करावी फक्त एकाच भाजीपाला पिकांची निवड करू नये कमीत कमी २-३ भाजीपाला पिकांच्या लागवडीचा विचार करावा ठराविक अंतरावर भाजीपाला पिकांच्या लागवडीचे नियोजन करणे गरजेचे आहे.

वाचा:Crop Insurance |फक्त १ रुपयात पिक विमा २०२५
भाजीपाल्याचे पिक घेताना पावसाचे प्रमाण कमी असल्यास करावयाच्या उपाययोजना:
भाजीपाला पिकांची शेती करण्यासाठी निवडलेल्या पिकांच्या महत्वाच्या अवस्थांमध्ये उदा:फुले येण्याची अवस्था ,त्याच बरोबर फळे परिपक्व होण्याच्या अवस्थेमध्ये पिकांना पाण्याचा ताण पडणार नाही ह्याची काळजी घेणे येथे महत्वाचे ठरते.भाजीपाला पिकांचे व्यवस्थापन मध्ये शेताच्या भोवताल शेवरी या पिकाची किंवा मक्याची दाट वाफ्याभोवताल लागवड केल्यास उष्ण व कोरडे वाऱ्यापासून पिकांचे संरक्षण होते.
हेही वाचा: Agriculture Education | १०० टक्के रोजगाराच्या संधी
पिकांच्या पाणी व्यवस्थापनासाठी सिंचन पद्धतीचा वापर करावा,सुश्म पद्धतीद्वारे पाणी देण्याची गरज भाजीपाला पिकांना असते. तुषार किंवा ठिबक सिंचनाद्वारे पाण्याचे व्यवस्थापन करावे त्याच बरोबर सुश्म सिंचनाद्वारे विद्राव्य खाते भाजीपाला पिकास द्यावी सेंद्रिय खाते व रासायनिक खतांचा योग्य समतोल राखणे गरजेचे आहे.
भाजीपाला पिक लागवडी साठी योग्य वाणाची निवड करावी जातीच्या विशेषतेचा अभ्यास याठिकाणी मोलाचा ठरतो उदा: ती जात बदलत्या हवामानाशी तग धरणारी असावी, जातीमध्ये किडांचे व रोगांपासून संरक्षणाइतकी प्रतिकारक्षमता असावी,जातीची निवड करत असताना कोणत्या हंगामात लागवड केली जात आहे,जमिनीचा प्रकार कसा आहे, त्याच बरोबर भाजीपाला पिकाच्या लागवडीचा उद्देश लक्षात ठेऊन लागवडीसाठी आवश्यक पिकाच्या जातीची निवड करावी.Vegetable Crop Management भाजीपाला पिकांचे व्यवस्थापन करताना जास्त पाने असणाऱ्या जातीची निवड केल्यास फुलांचे व फळांचे उन्हापासून संरक्षण होण्यास मदत मिळते किंवा उन्हापासून संरक्षणासाठी शेडनेट चा वापर फायदेशीर ठरतो.
पाण्याची उपलब्धता लक्षात ठेऊन योग्य प्रमाणात पाण्याचा वापर करावा उदा: फुलोरा पासून ते फळे काढणी पर्यंतच्या कालावधीत एकसमान पाणीपुरवठा करणे गरजेचे असते. पाण्याचा ताण पडणार नाही ह्याची काळजी घ्यावी.भाजीपाला पिकांना पाणी देण्याच्या वेळा सुनिचीत कराव्या.शक्यतो भाजीपाला पिकांसाठी पाणी पहाटे किंवा सकाळी किंवा संध्याकाळी व रात्रीच्या वेळी पाणीपुरवठा करावा, भाजीपाला पिकांना कडक उन्हात पाणी पुरवठा करू नये, फळे काढणीची वेळ संध्याकाळी ठेवावी व पहाटे प्रतीवारी प्याकिंग करून पहाटे मालाची वाहतूक करावी
पिकांनुसार करावयाच्या उपाययोजना:
कांदा :
- कमीत कमी जागेचा वापर कांद्याची रोपवाटिका तयार करण्यासाठी करावा.महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या फुले समर्थ ह्या वाणाची लागवड शेतकरी बंधूनी करावी हि एक संशोधनात्मक वाण असून ह्या वाणाची उत्पादन क्षमता अधिक आहे.
- भाजीपाला पिकांचे व्यवस्थापन Vegetable Crop Management करताना रोपवाटिका तयार करण्यासाठी गादी वाफ्याचा वापर करावा.बी उगवणीपर्यंत उसाच्या पानाने झाकून ठेवल्यास बियांची उगवण चांगल्या पद्धतीने होते.बीजप्रक्रिया पेरणीपूर्वी करणे गरजेचे असते. बी पेरत असताना पातळ वाफ्यावर पेरावी बी पेरणी आधी रोपवाटिका पूर्णपणे ओली करावी रेन पाईप किंवा तुषार सिंचनाचा वापर करावा.वाफ्यावर सावली असणे फायद्याचे ठरते त्यासाठी शेडनेट चा वापर करावा.
- १५.१० सेमी अंतर कांदा लागवडीसाठी योग्य आहे. ह्या अंतराने रोपांची लागवड करावी. पाण्याचे व्यवस्थापन सुनिचीत ठेवावे त्यासाठी तुषार सिंचन किवा ठिबक सिंचनाचा वापर केल्यास पाण्याची बचत होण्यास मदत मिळते.
- कांद्याची शेती करताना तनाचे नियंत्रण करणे गरजेचे असते कारण तणामुळे होणारा जमिनीतला पाण्यचा वापर आटोक्यात आणून जास्तीत जास्त पाण्याचा वापर हा पिकांसाठी करता येईल त्यासाठी पुढील उपाय करावा: Vegetable Crop Management २० ते २१ दिवसानंतर ऑक्सिफ्लोरोफेन ह्या तणनाशकाची फवारणी करावी १० लिटर पाण्यातून १२ प्रती फवारण्या असे केल्यास तन नियंत्रित राहण्यास मदत मिळते
- त्याचबरोबर बाष्परोधाकाचा वापर कांदा पिक घेताना करावा त्यासाठी केवोलीन चा वापर फायदेशीर ठरतो.
- रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव हा अति कोरडे व ढगाळ वातावरणात अधिक प्रमाणात दिसून येतो. रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुढील उपाय करावा. डायमेथोएट १५ मिली किवा फीप्रोनील १५ मिली + प्रती १० लिटर पाणी यांची फवारणी करावी
- कांद्याची काढणी हि जेव्हा कांदा पिकाची ५० % माना पडल्या असतील त्यावेळेस करावी (नोट:- १५ दिवसा अगोदरपासून पाणी देण्याचे टाळावे त्या दरम्यान पिकांवर बुरशीनाशकाची फवारणी करावी)
- कांद्याचे पिक काढल्यानंतर माल कमीत कमी ४ – ५ दिवस सुकवावा आणि परत ५-६ दिवस माल सावलीत सुकवावा कांदा पातीची कापणी करताना २ – ३ सेमी माना ठेवून पाताची कापणी करावी.
मिरची :

- शेतकरी बंधूनी मिरची भाजीपाला पिकांचे व्यवस्थापन करता सुरवाती पासून लक्ष देणे गरजेचे आहे ह्यावेळी वाणाची निवड महत्वाची ठरते अशावेळी पाण्याचा ताण सहन करणाऱ्या मिरची वाणाची निवड करावी.
- मिरची पिक घेताना उष्णतेचे प्रमाण कमी करण्यासाठी शेडनेट चा वापर करावा रोपवाटीकेमध्ये बियाणाची पेरणी झाल्यानंतर हा उपाय बंधनकारक आहे ह्यातून पिकाची उगवण क्षमता वाढते व उत्पादन वाढीसाठी त्याच बरोबर पिक सक्षम होण्यास मदत मिळते.
- भाजीपाला पिकांचे व्यवस्थापन Vegetable Crop Management करताना तुषार सिंचन किंवा रेन पाईपचा वापर रोपवाटीकेमध्ये पाणी देण्यासाठी करावा.कीटकनाशक किंवा बुरशीनाशकाची फवारणी करावी फवारणी करताना कमी तीव्रतेच्या रासायनिक फवारणीचा वापर करावा. यातून रोपवाटिकेमध्ये रोग व किडींचे संरक्षण होण्यास मदत मिळते
- रोपे ५ ते ६ आठवड्याची झाल्यानंतर जुलै महिन्याच्या शेवटी रोपांची पुनर्लागवड करणे गरजेचे आहे.रोपाची लागवड हि लवकर केली असल्यास एक सरी आड सरीला पाणी देण्याचे नियोजन ठेवावे.
- प्लास्टिक आच्छादनाच वापर हा जमिनीतील पाण्याचे उत्सर्जन कमी करण्यासाठी करावा यातून तनाचा प्रादुर्भाव देखील आटोक्यात राहतो. पाण्याचे नियोजन करण्यासाठी ठिबक पद्धतीचा वापर करावा.
- उष्ण व कोरडी वारे मिरची पिकास नुकसानदायक ठरतात त्यासाठी पुढील उपाय करता येईल उदा: चार ओळीनंतर एका ओळीत मका पिकाची लागवड येईल किंवा शेवरीचे पिक मिरची पिकाच्या चारही बाजूने लागवड करावी किंवा मका पिकाची देखील अशा पद्धतीने लागवड करणे फायद्याचे ठरते.
- मिरची पिकामध्ये फुले गळण्याचे प्रमाण जास्त असल्यास संजीवकांची फवारणी करावी त्यासाठी NAA या संजीवकांची १५ PPF इतक्या प्रमाणात फवारणी करावी.
टोमॅटो:

टोमॅटो पिकाच्या वाणाची निवड करत असताना वाणाची क्षमता लक्षात ठेऊन निवड करावी. कमी कालावधीत लागणाऱ्या वाणाची त्याचबरोबर पाण्याचा ताण सहन करू शकणाऱ्या वाणाची निवड शेतकरी बंधूनी करावी.रोपवाटिके मध्ये बियाणाची पेरणी करून तुषार संचाचा वापर करणे गरजेचे आहे.
किंडी व रोगापासून पिकांचे/ रोपांचे संरक्षण करणे गरजेचे आहे.रोपांची पुनर्लागवड करत असताना प्लास्टिक गादी आच्छादनाचा वापर करून रुंद गादीवाफ्यावर रोपांची पुनर्लागवड करावी.रोपांची पुनर्लागवड करण्यासाठी रोपे २५ दिवसाची होणे गरजेचे असते त्याआधी कमी पावसाच्या परिस्थितीचा अंदाज घ्यावा व पाण्याची उपलब्धता तपासावी.
उन्हाळी हंगामातील उशिरा टोमॅटोची लागवड करत असल्यास पाण्याचे व्यवस्थापन महत्वाचे ठरते.उन्हाळी हंगामात टोमॅटो फुलगळ मोठ्या प्रमाणात होत असते त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी NAA या संजीवकाची १५ PPF या थोड्या प्रमाणात सजीवकांची फवारणी केल्यास फुलगळ कमी होते.
भाजीपाला पिकांचे व्यवस्थापन करताना ( Vegetable Crop Management )पाण्याची उपलब्धता कमी असल्यास टोमॅटो पिकावर बाष्पीभवन रोधाकाची पानावर फवारणी करावी.टोमॅटो पिकांना पाणी भर उन्हात देऊ नये त्याऐवजी पिकांना पाणी सकाळी किंवा सायंकाळी किंवा रात्रीच्या वेळी द्यावे.
टोमॅटो पिक घेत असताना टोमॅटोची फळे तडकू शकतात यावर उपाय करावयाचा झाल्यास अन्नद्रव्याची फवारणी करावी त्यासाठी बोरॉन अन्नद्रवचा वापर केल्यास निश्चितच फायदा होतो.
टोमॅटो पिकावर रोग व किडींचा प्रादुर्भाव हा कोरड्या व ढगाळ वातावरणात जास्त असतो त्यासाठी पुढील उपाय करावा. मॅन्कोझेब २५ ग्राम प्रती १० लि पाणी व टेब्युकोनाझोल १० मिली किंवा ऑक्सिडीमेटोन मिथाईल १० मिली प्रती १० ली पाणी. यांचे एकजीव मिश्रण करून फवारावे हि कीटकनाशके व बुरशीनाशके टोमॅटो पिकासाठी फायद्याचे ठरतात.
भेंडी :

भेंडी पिकाची लागवड हि सरी वरंबा पद्धतीने करावी हि लागवड ३० x १५ सेमी ह्या अंतरावर करावी हंगामातील पावसाचे प्रमाण कमी असल्यास जास्तीत जास्त १५ जुलै पर्यंत भेंडी पिकाची लागवड करावी.प्लास्टिक आच्छादनाचा वापर रुंद गादी वाफ्यावर करून जोड ओळ पद्धतीने लागवड करावी आणि पाणी व्यवस्थापन हे ठिबक सिंचन पद्धतीने करावे.
भेंडीची लागवड केल्या नंतर विषाणुजन्य रोगांच प्रादुर्भाव पिकांवर येत असतो त्यासाठी रस शोषण किडींचा बंदोबस्त करणे गरजेचे असते.
वांगी :
उष्ण व कोरड्या हवामानात वांग्याचे पिक उत्तम येते त्यामुळे अशा भाजीपाला पिकाची ठराविक शेत्रात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. रोपवाटिका हि वांगी भाजीपाला पिकासाठी गादी वाफ्यावर करावी वांग्याची जातीची निवड करताना उंची कमी व पसरट पसरणाऱ्या वाणाची निवड करावी.
भाजीपाला पिकांचे व्यवस्थापन ( Vegetable Crop Management ) करताना रोप व किडींपासून रोपवाटिकेत संरक्षण करावे. पावसाचा अंदाज घ्यावा,पाण्याचे नियोजन करून ५ – ६ आठवड्यानी रोपे तयार झाल्यानंतर जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लागवड करावी वांगी भाजीपाला पिकासाठी ठिबक सिंचन व प्लास्टिक आच्छादनाचा वापर करवा.
पिके फुलोऱ्यात असताना फळगळतीचा प्रादुर्भाव जास्तीत जास्त जाणवतो.पावसाचा कालावधी लांबणीवर असल्यास किंवा फळगळ थांबवण्यासाठी पुढील उपाय करावा २-४-डी या सजीवाकांची १ पीपीएम या प्रमाणात फवारण करावी.
वांगा भाजीपाल्याचे पिक लवकर होत असाल तर पिकावर शेंडा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव जाणवतो तो टाळण्यासाठी उशिरा पेरणी करावी जास्तीत जास्त ऑगस्टच्या शेवटी रोपांची लागवड शेतकरी बंधूनी करावी.अन्नद्रव्याचे व्यवस्थापन संतुलित ठेवावे, ज्यावेळी फळे पोसण्याचा कालावधी असतो त्यावेळी पाण्याचा ताण पडणार नाही ह्याच दक्षता घ्यावी.
गवार:
भाजीपाला पिकामध्ये पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता गवार पिकामध्ये आहे परंतु बियाणाच्या उगवणीसाठी जमिनीमध्ये पाण्याचा ओलावा गरजेचा असतो पाण्याचे व्यवस्थापन सुरळीत असल्यास गवार पिकाची लागवड शेतकरी करू शकतात.
( Vegetable Crop Management ) गवार हे भाजीपाला पिक घेताना तनाचे नियंत्रण अधिक महत्वाचे ठरते. त्यासाठी पुढील उपाय करावा गावरचे पिक दोन पानावर असताना पेंडामेथीलीन किंवा ओडिसी या तननाशकाची फवारणी करावी.
भाजीपाला पिकांचे व्यवस्थापन करताना लागवड हि ३० x १५ सेमी अंतरावर करणे गरजेचे आहे. पावसाला विलंब होत असल्यास जास्तीत जास्त जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात बी टोकून लागवड करावी.
वेलवर्गीय भाजीपाल्याची पिके:

पाण्याची कमतरता,पावसाला होणारा विलंब अशा परिस्थितीत कारली,काकडी ,घोसाळी ,दुधीभोपळा , दोडका इत्यादी वेलवर्गीय भाजीपाला पिकांची निवड करावी,
Vegetable Crop Management वरील सर्व पिकांची लागवड हि बियाणे टोकून करायची असल्यामुळे उगवण्यासाठी थोड्या प्रमाणात ओलावा गरजेचा असतो.जास्तीत जास्त ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत वेलवर्गीय भाजीपाल्याची लागवड करणे गरजेचे असते.
वेलवर्गीय भाजीपाला पिक घेताना नर फुलाचे प्रमाण आटोक्यात ठेवणे गरजेचे असते इथ्रेल किंवा NAA या सजीवकांची वेल फवारणी करावी हि फवारणी वेलची अवस्था दोन ते तीन पानावर असताना करावी.
ताटी पद्धतीचा वापर हा वेलवर्गीय पिकांच्या वाढीसाठी लाभदायक असतो.पाण्याची कमतरता असल्यास ठिबक सिंचनाचा वापर पिके घेताना करावा.बुरशीजन्य,भुरीजन्य ,विषाणुजन्य इत्यादी किडींचा व्यवस्थापनासाठी कृषी तज्ञाचे मार्गदर्शनातून फवारणी करावी.
पालेभाज्याची पिके:
या मध्ये मेथी,पालक,शेपू,कोथिंबीर इत्यादी पालेभाज्या पिकाची निवड करता येईल. ३० – ४५ दिवसाचा कालावधी सर्वच पिके घेतात.त्यामुळे ह्यात पाण्याचे व्यवस्थापन महत्वाचे ठरते दर १५ दिवसानी बियाणाची लागवड केल्यास मालाचे व्यवस्थापन करता येते.
भाजीपाला पिकांचे व्यवस्थापन ( Vegetable Crop Management ) करताना पालेभाज्या पिक घेताना मिश्र पिकाची निवड करावी पिकांची निवड करताना सर्वसाधारण पाणी टंचाई विचार करून पिकांची निवड करणे फायद्याचे ठरते रेन पाईप व तुषार सिंचनाचा वापर हा पालेभाज्या पिकांसाठी करावा. पाण्याची साठवणूक करता आल्यास उत्तम पाणी व्यवस्थापन करता येते.
पालेभाज्या पिकांवर कीटकनाशक व बुरशीनाशकाचा फवारणीसाठी वापर करणे टाळावे.
पिके शेडनेट/पॉलीहाऊस मध्ये असल्यास करावयाच्या उपाययोजना:
शेतकरी मित्रानो, शेडनेट/पॉलीहाऊस मध्ये पिकांची लागवड केली तर प्रामुख्याने ढोबळ मिरची, काकडी,कारली,इत्यादीची लागवड केली तर पाण्याच्या व्यवस्थापनामध्ये लक्ष देणे महत्वाचे ठरते जर पाण्याची कमतरता असल्यास प्लास्टिक च्या बाटलीमध्ये पाणी भरून प्रत्येक रोपाजवळ बाटली ठेवावी थेंब थेंब पाणी मुळापर्यंत जाईल ह्या पद्धतीची रचना बाटली ठेवताना करावी. असे केल्यास कमीत कमी पाण्यात चांगल्या पद्धतीने उत्पादन घेता येईल
Vegetable Crop Management रोग व किडींचा बंदोबस्तासाठी कृषी संशोधकांच्या मार्गदर्शनाखाली उपाययोजना कराव्यात.