Organic farming|सेंद्रियशेती जागतिक बाजारपेठेत मोठी मागणी

Organic Farming In Marathi :

Organic farming : सेंद्रिय शेतीचे महत्व जागतिक बाजारपेठेत वाढत चालले आहे , संयुक्त राष्ट्रे परिषदे मध्ये यावर चर्चा झाली असून पुढील काही वर्षात १० लाख कोटीची जागतिक बाजार पेठ खुली करत असल्याचा विचार संयुक्त राष्ट्रे (United Nation) यांनी आपल्या अहवालात सांगितले. रसायनाचा वाढता वापर जमिनीची सुपीकता ढासळवत असून त्याचा थेट परिणाम पर्यावरणावर होत आहे, पर्यावरणीय चक्रा मध्ये वाढता बदल लक्षात घेता हा महत्वपूर्ण निर्णय सर्व देशांनी मिळून घेण्यचे सांगण्यात येते .अन्नधान्यात रसायनाचा अतिरेक झाल्यामुळे मनुष्यचे आयुर्मान कमी झाल्यचे पुरावे या परिषदेत देण्यात आले .Organic farming सेंद्रिय शेती साठी पुढील काळात सोन्यचे दिवस येणार असून शेतकरी बांधवांनी याचा विचार करणे अत्यंत महत्वाचे आहे.

ड्रोन फवारणी

या लेखात आपण सेंद्रिय शेती करण्यासाठी लागणारी संपूर्ण माहिती बघणार आहोत .मला विश्वास आहे कि निश्चितच हा लेख शेतकरी बंधूना सेंद्रिय शेती करताना उपयुक्त ठरेल.

Organic Farming

वाचा ड्रोन फवारणी अनुदान योजना


नैसर्गिक संसाधने चे महत्व :

  • वातावरणात नायट्रोजन जे प्रमाण सर्वात जास्त ७८%
  • सूर्य प्रकाश मोठ्या प्रमाणात
  • सेंद्रिय शेतीorganic farming मध्ये वनस्पतीच्या वाढी साठी मुख्यता जीवाणूची आवशकता असते उदा:गांडूळ
  • देशी गाय- ४०० ते ५०० कोटी जीवाणू देशी गायच्या शेणात असतात. ३५ एकर क्षेत्रासाठी १ गाय पुरेशी असते
  • Organic Farming साठी शेतातून निघणारा सेंद्रिय पालापाचोळा ,काडीकचरा ,शेतातील मातीत परत टाकावा रोटावेहटर ने तो बारीक केल्यास मातीत मिसळवता येतो .
  • जीवामृत व बिजामृत तयार करणे कीड रोगांपासून बियाणांचे संरशन यातून करता येते
  • सेंद्रिय शेती ची उत्पादकता वाढवण्यासाठी आच्छादन महत्वाचे.
  • ह्युमस-वनस्पती कुजून तयार झालेली काळी माती,अत्यंत महत्वाची हि जमिनीला सुपीकता प्रदान करते.
  • सेंद्रिय शेतीत जीवन द्रव्याची आवशकता ,काष्ट पदार्थाच्या कुजण्यातून जीवन द्रवे तयार होतात
  • सेंद्रिय कार्ब- वनस्पतीजन्य काडीकचरा यांच्या कार्बन घटकापासून तयार होतो
  • कंपोस्ट- चा पुनर्वापर करणे
  • विविधांगी पिक ची लागवड Organic Farming मध्ये करणे गरजेचे आहे .

सेंद्रिय कार्ब चे फायदे :

१)Organic Farming सेंद्रिय कार्ब चे प्रमाण जितके जास्त तितकीच जमिनीची सुपीकता जास्त असते,त्याचा फायदा उत्पादन वाढीसाठी होतो

२) सेंद्रिय कार्ब मुळे जमीनित स्थिरीकरण होते .नायट्रोजन ९०% ते ९५% असते ,फॉस्फरस चे प्रमाण ७० ते ८० टक्के ,सल्फर चे प्रमाण २० ते २५ टक्के .

३) जीवन द्रव्याची वाढ करते व पोषक द्रव्याची वाढ करते

४) मातीमध्ये पाणी व हवा खेळन्यासाठी पोकळी तयार होते

५) मातीची सुपीकता सुधारते, धूप कमी होण्यास मदत मिळते

६) मुळानच्या वाढीसाठी पोषक वातावरण निर्मान होण्यास मदत मिळते

७) पावसाचे पाणी शोषण्याची/निचर्याची क्षमता वाढते ,सेंद्रिय शेतीत पाण्याचा वापर कमी होण्य्स मदत होते

८) जीवाणू व विविध नैसर्गिक सजीवांची वाढ होण्यास मदत मिळते .

९) जमिन सेंद्रिय कार्बची साठवणूक करत असते ते पुढील पिकांसाठी उपयोगी ठरते

१०) रासायनिक खतांची तीव्रता कमी करण्यास मदत मिळते

Visit official Gov. website


जैविकऔषधी तयार करण्यची पद्धती:

Organic Farmingजमीन सुपीक करण्यासाठी पिक वाढविन्यासाठी बिजामृत चा वापर करावा

बिजामृत बनविण्याची पद्धत :-

१०० किलो बियाणासाठी

  • २५ ली पाणी घ्यावे
  • ५ किलो देशी गायचे शेन
  • ५ ली गोमुत्र
  • माती १ वाटी
  • ३०० ग्राम चुना(कळीचा )

यांचे मिश्रण तयार करावे हे मिश्रण चांगले मिसळून झाल्यवर २४ तास सावलीत ठेवणे गरजेच आहे , १ ते २ दिवसात हे मिश्रण वापरावे ,अवकाळी ढग त्याच बरोबर पावसाळ्यामध्ये जंतू व बुरशीचे अंड वाहून येत असतात ,हवे मधील आद्रता असल्यामुळे ती अंडी उघड्या बियाना वर येऊन बसत असतात. Organic farming मध्ये बियाणांचे वैवास्थित बीज संस्कार केले नाहीतर ती अंडी पेरणीच्या वेळी जमिनीत जातात व परिस्थिती नुसार पसरतात .

बियानांवर देशी गाईचे शेन व गोमुत्र असल्यामुळे ते जमिनीत गेल्यावर बियाणांची रोग प्रतिकार शक्ती वाढते व त्यातून मुळानचे संरशन होण्यास मदत मिळते

गोमुत्रामुळे जंतू मृत पावतात व बी पूर्णपणे शुद्ध होते. पाने गळून पडण्यची शक्यता समूळ नष्ट होते

Organic Farming मध्ये धान्य पिक जसे कि भात,गहू,बाजरी,मक्का,ज्वारी या सारख्या पिकांसाठी गावराणी बियाणी वापरावी यांचे बी घेऊन ते बी सावली मध्ये पसरवा व त्यावर आवशयक त्या प्रमाणात बिजामृत टाका बियाणे चांगल्या प्रकारे एकजीव करा व नंतर सावली मध्ये सुकवा आणि नंतर पेरणी करा


जीवामृत बनविण्याची पद्धत :

सेंद्रिय शेती Organic farming मध्ये जीवामृत अतिशय महत्वाचे आहे ,बनविण्याची पद्धती पुढील प्रमाणे

  • प्लास्टिक ड्रम
  • पाणी १८० ली घ्यावे
  • १० कि बैलाचे/देशी गाईचे शेन
  • १० ली गोमुत्र
  • २ किलो गुळ
  • २ किलो बेसन
  • ५०० ग्राम मोठ्या झाडाखालची माती घ्यावी

यांचे एकजीव मिश्रण करून घ्यावे ,डावीकडून उजवीकडे फिरवावे हे जीवामृत तयार होण्यास ३ ते ४ दिवसाचा कालावधी लागतो.सावलीमध्ये ठेवणे आवश्यक आहे ,सरळ सूर्य प्रकाश चा संबंध जीवामृत सोबत होणार नाही याची दक्षता घ्यावी, तयार झाल्यावर ७ दिवसात याचा वापर करणे अनिवार्य आहे.

दोन रोपांच्या मधात एक एक कप जीवामृत महिन्यातून दोनदा टाकावे असे केल्यास चमत्कारिक वाढ पाहण्यास मिळेल ,एकेरी २०० ली जीवामृत टाकावे हे प्रमाण पावसाळ्यात ठेवावे.

पावसाळ्यानंतर याचे प्रमाण २०० ते ४०० ली असणे आवश्यक आहे ,पावसाळ्यात जमिनीला जेवढे जास्त जीवामृत देऊ तेवढीच वाढ पिकांमध्ये होत असते.

जीवामृत हे बुरशी वर काम करणारे अत्यंत चांगले औषध आहे त्या सोबतच ते एक जीवन द्रवेना विरजण आहे ,जंतू नाशक आहे, पिकांची उगवण क्षमता वाढवून उत्पादन वाढीत भर घालतो.

झाडाच्या वाढीसाठी लागणारे हार्मोन्स जीवामृत मध्ये असतात त्यामुळे झाडाच्या पानाचा आकार वाढीस त्याचा फायदा होत असतो, organic farming मध्ये जीवामृतची फवारणी केल्यास जीवामृत मध्ये असलेले डायझोट्रॉफिक ची फवारणी केल्यानंतर डायझोट्रॉफिक चे जीवाणू पानावर पसरतात व हवेतले नत्र घेऊन पिकांची सुधरूढता वाढवतात त्याच बरोबर हवेतले धुळीचे कन हे जीवाणू खेचून घेतात व पानांना खनिज मुलद्रावे यातून मिळतात.

रासायनिक खताचा उत्तम पर्याय म्हणून जीवामृतओळखले जाते कार्ब युक्त अन्न म्हणून याचा उपयोग केला जातो.


घन जीवामृत :-

organic farming एक एकरसाठीचे प्रमाण

  • १०० कि देशी गाईचे शेन (सुकलेले)
  • १० ली जुने जीवामृत मिश्रण एकजीव करावे
  • ३ दिवस सावलीत सुखवावे
  • ६ पूर्ण पणे तयार होण्यास ६ दिवसाचा कालावधी लागतो
  • सुकलेले घनजीवामृत चांगले असते
  • ५ ते ७ क्विंटल प्रती एकर
  • सुरवातीला १४ ते १५ क्विंटल प्रती एकर

घन जीवामृतचे फायदे :-

१) जीवन्द्रावे चे मुख्य खाद्य म्हणन घन जीवामृत ओळखले जाते

२) छोटे तसेच मुख्य अन्नद्रव्ये पुरवण्याचे काम करते

३) घन जीवामृत मध्ये शेणखतात असणारे सर्व घटक असतात म्हणून पुन्हा शेणखत टाकण्याची आवश्यकता राहत नाही

४) वखरणीच्या आधी टाकल्यास उत्तम फायदा होतो


गांधुळखात :

माती सोबत कुजलेला झाडांचा पालापाचोडा गांडूळखात असतात त्यांच्या विष्ठेतून झाडांसाठी लागणारे पोषक द्रवे बाहेर पडत असतात,कृषी विभागामार्फत गांडूळ मिळू शकतात गांडूळ खात तयार होण्यास १ महिन्याचा कलवधी लागतो.

  • गांडूळ खात तयार करण्यसाठी टाक्याची गरज असते टाके सावलीत ठेवावे
  • झाडाचा कुजलेला पालापाचोळा शेन आणि माती एकजीव मिसळून घ्यावी
  • टाक्यातील मातीमध्ये ओलावा असणे आवश्यक आहे
  • त्यात जिवंत गांडूळ सोडावे.

गांडूळ खात तयार झाल्यवर जमिनीत सोडावे व परत टाक्यात माती टाकून द्यावी ,गांडूळ ची संख्या जमिनीत वाढवणे महत्वाचे आहे organic farming मध्ये याचे सर्वात मोलाचे काम आहे,गांडुळे जमीन सुपीक बनवते त्यामुळे रासायनिक खात टाकायची गरज राहत नाही


शेतकरी मित्रानो इथ पर्यंत आलात तर समोरील माहिती Organic Farming साठी अत्यंत महत्वाची आहे.

Organic Farming जीवामृत फवारणीची पद्धत:

खरीप पिकांसाठी प्रती एकर माप :

१) पहिली फवारणी :-

पेरणी झाल्या नंतर ३० दिवसांनी १०० ली पाणी + ५ ली जीवामृत

२) दुसरी फवारणी :-

पहिल्या फवारणी नंतर २० दिवसांनी १५० ली पाणी + १० ली जीवामृत

३) तिसरी फवारणी :-

दुसरी फवारणी नंतर २० दिवसांनी २०० ली पाणी + २० ली जीवामृत

४) चौथी फवारणी (शेवटची) :-

फळ बाल्यअवस्थेत असताना २०० ली पाणी + ६ ली आंबट ताक


भाजीपाला पिकांसाठी प्रती एकर माप :

१)पहिली फवारणी :-

पेरणी झाल्या नंतर १ महिन्यांनी १०० ली पाणी + ५ ली गाळून घेतलेले जीवामृत

२) दुसरी फवारणी :-

पहिली फवारणी नंतर १० दिवसांनी १०० ली पाणी + २.५ ली आंबट ताक

३) तिसरी फवारणी :-

दुसरी फवारणी झाल्या नंतर १० दिवसांनी १०० ली पाणी + २.५ ली आंबट ताक

४) चौथी फवारणी :-

तिसरी फवारणी नंतर १० दिवसांनी १५० ली पाणी + १० ली गाळून घेतलेले जीवामृत

५) पाचवी फवारणी :-

चौथी फवारणी नंतर १० दिवसांनी १५० ली पाणी + ५ ली दशपर्णी अर्क

६) सहावी फवारणी :-

पाचवी फवारणी झाल्या नंतर १० दिवसांनी १५० ली पाणी + ४ ली आंबट ताक

७) सातवी फवारणी :-

सहावी फवारणी झाल्या नंतर १० दिवसांनी २०० ली पाणी + २०० ली गाळून घेतलेले जीवामृत

८) आठवी फवारणी :-

सातवी फवारणी झाल्या नंतर १० दिवसांनी २०० ली पाणी + १० ली दशपर्णी अर्क

९) नववी फवारणी (शेवटची):-

आठवी फवारणी झाल्यानंतर १० दिवसांनी २०० ली पाणी + ६ ली आंबट ताक


नवीन फळबागासाठी प्रती एकर माप:

१) पहिली फवारणी :-

कलम लागवडी नंतर १ महिन्यांनी १०० ली पाणी + ५ ली जीवामृत

२) दुसरी फवारणी :-

पहिली फवारणी झाल्यानंतर १ महिन्यांनी १५० ली पाणी + १० ली जीवामृत

३) तिसरी फवारणी:-

दुसरी फवारणी झाल्यानंतर १ महिन्यांनी २०० ली पाणी + २० ली जीवामृत

शेतकरी बंधुनो Organic Farming मध्ये पुढील फवारण्या तिसऱ्या फवारणी सारख्या ठेवाव्यात प्रत्येक महिन्यात (२०० ली पाणी + २० ली जीवामृत)


तापमान ,पाणी,जमिनीच प्रकार ,वातावरण ,पिकांची अवस्था यानुसार थोड्याप्रमाणात मात्रा/डोज कमी जास्त होऊ शकतात शेतकऱ्यांनी याची दक्षता घ्यावी.

  • शेतकरी बांधवानो , नैसर्गिक शेतीची संपूर्ण माहिती एका लेखात सांगणे शक्य नाही , अशीच महत्वपूर्ण माहितीसाठी परत एकदा नक्की भेट द्या.

WebsiteLink

WhatsApp Group Link