Nanaji deshmukh krishi sanjivani scheme :
Nanaji deshmukh krishi sanjivani yojana 2025:मागील काही वर्षा पासून वातावरणातील सततच्या बदलांमुळे महाराष्ट्रातील शेती शेत्रात प्रतिकूल परिस्थिती बघावयास मिळत आहे. यामुळे पारंपारिक शेती पद्धतीमुळे अचूकता साधता येत नाही.कारण सतत वातावरणातील होणारा बदल हा नियोजनाचे गणित चुकवीत असल्याचे आढळून येते.शेतकरी वर्गामध्ये अशा पद्धतीच्या लहरी वातावरणाशी जुळवून घेणे हेच एक आव्हान ठरले जात आहे.ह्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना सक्षम बनवण्यासाठी व पारंपारिक शेती पद्धतीला तंत्रज्ञानाची जोड देऊन शेती व्यवसाय किफायतशीर होण्यासाठी राज्य सरकार व जागतिक बँकेच्या संयोजनातून आपल्या राज्यात Nanaji deshmukh krishi sanjivani yojana राबवण्यात येत आहे.ह्या प्रकल्पाची अमलबजावणी हि प्रामुख्याने मराठवाडा,विदर्भ व उत्तर महाराष्ट्र राबवण्याचे महाराष्ट्र सरकारने ठरविले आहे.

Nanaji deshmukh krishi sanjivani yojana 2025 मध्ये १५ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला असून त्यामध्ये औरंगाबाद, जालना, नांदेड, परभणी, लातूर, उस्मानाबाद, अमरावती, अकोला, वाशीम, यवतमाळ, वर्धा, जळगाव, बुलढाणा, हिंगोली, बीड ह्या जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे.ह्या प्रकल्पा अंतर्गत शेतकरी,महिला गट व शेतकरी उत्पादक कंपन्याना शेती व शेती वर आधारित असलेल्या व्यवसायाला किफायतशीर बनवण्यासाठी तांत्रिक व आर्थिक मदत दिली जाणार असून शेतकरी बंधूनी ह्याचा आवश्य लाभ घ्यावा.
Nanaji deshmukh krishi sanjivani scheme हवामान बदलाची समस्या हि फक्त मर्यादित नसून मोठ्या प्रमाणात जागतिक पातळीवर देखील पहावयास मिळत आहे. म्हणून ह्या लहरी वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी व शेती किफायतशीर बनवण्यासाठी आता शेतीमध्ये जाणीवपूर्वक बदल करणे हि काळाची गरज बनली आहे. वातावरणातील बदलांच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न हे कृषी विद्यापीठ, कृषी संशोधन संस्था, कृषी विज्ञान केंद्रातील संशोधकांकडून होताना आपण बघत आहोत. हवामानाशी जुळवून घेण्याचे तंत्रज्ञान विकसित करण्याचे प्रयत्न केले जात असून ह्या पद्धतीच्या तंत्रज्ञानाचा अवलंब बऱ्याच शेतकऱ्याकडून करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त स्थानिक परिस्थितीत उपयुक्त ठरणारे तंत्रज्ञान विकसित केले गेले असून बरेच प्रयोगशील शेतकऱ्यांनी सुद्धा कठीण परिश्रमातून हे यशस्वी करून दाखविले आहे.
शेतकरी बंधुनो, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत पुढील घटकात लाभ मिळतो त्यामध्ये वृक्ष लागवड,फळबाग लागवड, पॉली हाउस, शेडनेट हाउस, रेशीम उद्योग, मधुमक्षिका पालन, गोड्या पाण्यातील मत्सपालन, गांडूळखत युनिट, नाडेप, कंपोस्ट, सेंद्रिय निविष्टा, उत्पादन युनिट, शेततळे,शेततळे अस्तरीकरण, विहिरी, ठिबक सिंचन, पंपसंच ,पाईपलाईन इत्यादी बाबी मध्ये शेतकऱ्यांना अनुदान मिळते.

हेही वाचा :>
Latest News :शेतकऱ्यानो उद्योजक होण्याची सुवर्ण संधी सरकार देणार ५० लाखाचे अनुदान
Nanaji deshmukh krishi sanjivani yojana 2025 मध्ये बदलत्या हवामानाशी जुळवून घेण्यासाठीच्या उपयुक्त तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यात येत आहे.त्यामध्ये शेतकऱ्यांपर्यंत शेतीशाळा , प्रत्याशिके ,प्रशिक्षण अभ्यास दौरे आयोजित करण्यात येत असून शेतकरी वर्गामध्ये हवामान तंत्रज्ञानाचे कौशल्य विकसित करण्यासाठी विशेष कार्य राबविण्यास सुरवात झाली आहे. बदलत्या हवामानामुळे शेतीवर होणाऱ्या नुकसानीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी कृषी सहाय्यक, कृषी मित्र, शेतीशाळेचे प्रशिक्षण सर्वतोपरी प्रयत्न करत असून गाव पातळीवर शेतकऱ्यांशी संवाद साधून आधुनिक तंत्रज्ञानबद्दल माहिती देत असतात.शेती शेत्रात प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करणे हे ह्या Nanaji deshmukh krishi sanjivani scheme चे मुख्य उदिष्ट आहे.
हेही वाचा: फळबाग योजनेवर १०० % सबसिडी ! संधी सोडू नका.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेची उदिष्टे :
Krishi Sanjivani Yojana Maharashtra
- हवामान स्मार्ट तंत्रज्ञान पद्धतीचा अवलंब करून शेती आणि सुश्म पाणलोट पातळीवर कृषी शेत्रामध्ये परिवर्तणात्मक बदल घडवून आणणे.
- दुष्काळग्रस्त भाग, शारतेचे प्रमाण अधिक असलेल्या भागामध्ये तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अडचणी दूर करणे.
- शेतकरी, शेतकरी गट , शेतकरी समुदायांना हा प्रकल्प उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करत असून नैसर्गिक संसाधनाचा कमीतकमी वापर करून कृषी उत्पादनाचे मूल्यवर्धन करणे व हवामान सुसंगत कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी गुंतवणुकीस अर्थ सहाय्य पुरवणे.
हेही वाचा :शेतकऱ्यानो आता सहज मिळवा ५ लाखा पर्यंत कर्ज
नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेचे फायदे :
Krishi Sanjivani Yojana Maharashtra
१) हवामान अनुकूल उपक्रम शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात उभारण्यासाठी अर्थ सहाय्य पुरवणे.
२) संरक्षित लागवड तंत्रज्ञानावर भर देणे, त्यामध्ये पॉली हाउस , पॉली टॅनेल इत्यादीच्या सहाय्याने संरक्षित शेतीसाठी अर्थ सहाय्य पुरवणे.
३) शेती मध्ये वापरली जाणारी जल संधारण उपक्रम उभारणे त्यामध्ये ठिबक, स्प्रीक्लर ,शेत तळे , शेत तलावाचे अस्तर इत्यादी बाबी साठी अर्थसहाय्य पुरवणे.
४) बदलत्या हवामानाशी सुसंगत असे अनुकूल बियाणे उपलब्ध करून दिले जाते.
५) शेतकरी उत्पादक कंपनी / संस्था व बचत गटांना विशिष्ट मदत पुरवते.
६) अपंग व्यक्ती, महिला व भूमिहीन कामगारांना विशिष्ट सवलतीसह विशेषाधिकार प्रदान करते.
हे देखील वाचा :शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! पुढील हप्ता लवकरच
नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेसाठीची पात्रता :
Nanaji deshmukh krishi sanjivani yojana 2025
- प्रकल्पांतर्गत येणाऱ्या जिल्ह्यामधील शेतकरी उत्पादक कंपन्या, नोंदणीकृत शेतकरी गट, स्वयंमदत गट.
- प्रकल्पांतर्गत येणाऱ्या जिल्यातील कमीत कमी १०० सदस्यसह नोंदणीकृत FPA कृषी व्यवसाय ह्या योजनेंतर्गत लाभ घेऊ शकतात.
- अर्ज करणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपन्या / शेतकरी / कृषी इनपुट सेवा केंद्र किंवा उद्योग स्थापन करून ते चालवण्यास पुरेशी सक्षम असणे गरजेचे राहील.
- प्रकल्पांतर्गत २० लाख रुपयापेक्षा अधिक किमतीच्या प्रकल्पास शेतकरी उत्पादक कंपनी/बँका /वित्तीय संस्था द्वारे मंजूर केलेले असावे. कर्जाची रक्कम अनुदानाच्या १.२५ पट असणे बंधनकारक राहील.
- भूमिहीन कुटुंबातील व्यक्तीचा देखील ह्या प्रकल्पांतर्गत विचार केला गेला असून त्यामध्ये भूमिहीन व्यक्ती, विधवा , महिला, घटस्पोटीत महिला, अनुसूचित जाती /जमाती मधील महिला शेतकरी यांना बंधिस्त शेळीपालन आणि कुक्कुटपालन घटकांचा लाभ मिळतो.
- Nanaji deshmukh krishi sanjivani scheme प्रकल्पांतर्गत येणाऱ्या गावामधील २ हेक्टर पर्यंत जमीन असलेले शेतकरी व भूमिहीन कुटुंबे यांना व्यायाक्तिक लाभामध्ये ७५ % अर्थसहाय्य दिले जाते.त्याचबरोबर २ हेक्टर पेक्षा जास्त परंतु ५ हेक्टर पर्यंत जमीनधारक शेतकऱ्यास व्यायाक्तिक लाभ हा ६५ % पर्यंत अर्थसहाय्य दिले जाते.
अनुदानावर मिळणारी शेतीपूरक अवजारे :

ट्रक्टर व BBF यंत्र,पॉवर टिलर ,रिपर कम ,बाईंडर, पॉवर विडर, रिपर, ब्रश कटर , थ्रेशर ,पलटी नांगर , शुगरकेन थ्रेश कटर, रोटाव्हेटर, कॉटन थ्रेडर, स्ट्रो टिपर, मिनी दालमिल, ऑईल मिल फिल्टर प्रेस सहित इत्यादी अवजारे अनुदानावर मिळविली जाऊ शकतात.
औजारांसाठी योजनेची पात्रता निकष :

Nanaji deshmukh krishi sanjivani yojana 2025
ट्रक्टर व BBF यंत्रासाठी
- कमीतकमी १ हेक्टर जमीनधारक शेतकरी ह्यासाठी अर्ज करू शकतात.१ हेक्टर जमीन बंधनकारक राहील.
- अर्जदार शेतकऱ्यास ट्रक्टर सोबत BBF यंत्राचा अर्ज करणे बंधनकारक राहील.
- अर्जदाराच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावावर ट्रक्टर असल्यास अर्ज करता येणार नाही.(कुटुंबामध्ये आई वडील व अपत्ये अविवाहित)
- ट्रक्टर साठी अर्ज करावयाचा असल्यास एका कुटुंबातील एकच सदस्य अर्ज करू शकतो.
Nanaji Deshmukh Krishi Sanjivani Yojana
इतर औजारांसाठीचे पात्रता निकष:
- इतर औजारांसाठी योजनेचा लाभ घ्यावयाचा असल्यास सदर अवजाराचा लाभ इतर कुठल्याही योजनेतून घेतलेला नसावा.
- एका शेतकऱ्यास (अर्जदारास) प्रकल्प कालावधीमध्ये ट्रक्टर अधिक BBF यंत्रा व्यतिरिक्त कुठल्याही एका यंत्रासाठी किंवा औजारासाठी अर्ज करता येईल.
- ट्रक्टर वर चालविल्या जाणाऱ्या इतर यंत्रांचा किंवा अवजारांचा लाभ घेण्यासाठी, यंत्रणा चालवण्यासाठी लागणाऱ्या सक्षम अश्वशक्तीचा ट्रक्टर असणे बंधनकारक राहील.
- अर्जदार हा अविवाहित व आई वडिलांवर अवलंबून असल्यास व त्याच्या नावे किंवा कुटुंबातील इतर सद्स्यच्या नावे ट्रक्टर असल्यास इतर यंत्र/अवजारासाठी अर्जदार पात्र ठरू शकतो परंतु सदर अर्जदारास कुटुंबातील सदस्यच्या नावावर ट्रक्टर असल्याचा पुरावा जोडणे बंधनकारक राहील.
- जी यंत्रे ट्रक्टर शिवाय चालविली जातात अशा यंत्रांची खरेदी करावयाची असल्यास एका कुटुंबातील फक्त एका सदस्यास अर्ज करण्याची परवानगी राहील.
योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे :
१) आधार क्रमांक
२) जमिनीचा तपशील ८ अ व ७/१२ उतारा
३) अर्जदार अनुसूचित जाती जमातीचा असल्यास (जात प्रामाणपत्र)
४) अर्जदार भूमिहीन असल्यास (भूमिहीन प्रमाणपत्र)
५) अर्जदार विधवा असल्यास (पतीचे मृत्यूपत्र)
६) अर्जदार घटस्फोटीत महिला असल्यास (घटस्फोटीत प्रमाणपत्र)
योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे करावा :
Nanaji Deshmukh Krishi Sanjivani Yojana
अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन ठेवण्यात आली असून https://dbt.mahapocra.gov.in/ येथे क्लिक करून अर्ज करू शकता
सतत विचारले जाणारे प्रश्न | FAQ
प्रश्न १) Nanaji Deshmukh Krishi Sanjivani Yojana अंतर्गत शेतकऱ्याना कोणते लाभ मिळतात ?
उत्तर- लहान व सीमांत शेतकरी ज्यांच्या कडे ५ हेक्टर पर्यंत जमीन आहे त्यांना, ठिबक सिंचन, स्प्रीन्क्लेर, शेततळे, पॉली टॅनेल, सावली जाळी इत्यादी हवामान अनुकूल उपक्रमासाठी ८० % पर्यंत आर्थिक मदत दिली जाते.
प्रश्न २) NDKSP अंतर्गत पैसे देण्याची प्रक्रिया काय आहे ?
उत्तर- अनुदान हे क्रेडीट लिंकड बँक एन्डेड सबसिडी च्या आधारावर दिले जाते.
प्रश्न ३ ) NDKSP योजनेअंतर्गत तुमच्या गावाचा समावेश नसल्यास काय करता येईल ?
उत्तर- योजनेमध्ये गावांचा समावेश हा हवामान अनुकूल परिस्थिती नुसार करण्यात आला असून, गावाचा समावेश नसल्यास ह्या योजनेतून लाभ घेता येणार नाही,परंतु आपल्या जवळच्या कृषी विभागाशी संपर्क साधून निशितच इतर योजनाचा लाभ घेऊ शकता.
प्रश ४ ) Nanaji Deshmukh Krishi Sanjivani Yojana अंतर्गत आधुनिक तंत्रज्ञानाशी सुसंगत अवजाराचे प्रशिक्षण दिले जाते का ?
उत्तर- हो, NDKSP फिल्ड स्कूल उपक्रम राबविल्या जातो. यामध्ये शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण वर्ग अयोजीत केले जातात हवामान अनुकूल वातावरणात शेती किफायतशीर बनविण्याचे प्रशिक्षण दिले जाते.
प्रश्न ५) शेतकरी उत्पादक संघटनेचा सदस्य ह्या योजनेसाठी अर्ज करू शकतो का ?
उत्तर -हो, प्रकल्पांतर्गत येणाऱ्या जिल्ह्यामधील शेतकरी उत्पादक कंपन्या, नोंदणीकृत शेतकरी गट, स्वयंमदत गट,शेतकरी उत्पादक संघटनेचा सदस्य अर्ज करू शकतात.
प्रश्न ६) १ हेक्टर पेक्षा कमी जमीनधारक शेतकरी ह्या योजनेसाठी अर्ज करू शकतो का ?
उत्तर – हो तुम्ही देखील ह्या योजनेसाठी अर्ज करू शकता.
प्रश्न ७) ५ हेक्टर पेक्षा जास्त जमीन असलेला शेतकरी ह्या योजनेसाठी अर्ज करू शकतो का ?
उत्तर- नाही, ५ हेक्टर पेक्षा जास्त जमीनधारक शेतकरी ह्या योजनेसाठी अर्ज करू शकत नाही परंतु तुम्ही योजनेंतर्गत चालविल्या जाणाऱ्या प्रशिक्षण उपक्रमाचा लाभ नक्कीच घेऊ शकता.
प्रश्न ८) भूमिहीन शेतकरी जमिनीची आवश्यकता नसलेल्या कामासाठी अर्ज करू शकतो का ?
उत्तर – होय तुम्ही इतर उपक्रमासाठी सुद्धा अर्ज करू शकता त्यामध्ये कुक्कुटपालन, शेळीपालन,एपिकल्चर यासारख्या उपक्रमासाठी अर्ज करु शकता.
प्रश्न ९) Nanaji deshmukh krishi sanjivani yojana 2025 शेडनेट साठी अर्ज प्रक्रिया काय आहे ?
उत्तर – ५ हेक्टर पेक्षा कमी जमिन असणे बंधनकारक असेल इतर कुठलेही विशिष्ट निकष शेड नेट साठी नाहीत.तुम्ही आधीच निधीची पूर्तता केलेली असावी कारण काम पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण पडताळणी यशस्वी रित्या झाल्यावरच तुम्हाला आर्थिक मदत दिली जाते.
शेती नियोजाना संबंधित कृषी विद्यापीठाच्या शिफारसी
ऊस लागवड तंत्रज्ञान एकरी ९० ते १०० टन ऊस उत्पादन