kharip Crop planning|आपत्कालीन परिस्थितीत असे करा नियोजन

kharip Crop planning in Marathi:

kharip Crop planning:महाराष्ट्रातील शेतीचा विचार केल्यास शेती ही अधिकतर पावसावर अवलंबून आहे.हवामानातील वाढत्या बदलामुळे पावसाचे प्रमाण कमी जास्त प्रमाणात होत असते.पावसाचे प्रमाण कमी कालावधीत जास्त पाऊस होतो किवा दोन पावसातील मोठ्या फरकामुळे पिकांची उत्पादकता कमी होते यामुळे उत्पन्नात नेहमीच अस्थिरता बघावयास मिळते, त्यामुळे अशा आपत्कालीन परिस्थितीत खरीप पिकाचे नियोजन करणे ( kharip Crop planning )अत्यंत महत्वाचे ठरते.नैसर्गिक रचणे नुसार सर्वसाधारणपणे जुन महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पावसाला सुरवात होते तेथून पुढे जमिनीची मशागत पूर्ण करून (भुईमुग,तीळ,सुर्यफुल इत्यादी) गळीत पिकांची त्याच बरोबर (मुग,चवळी,उडीद) यासारखी कडधान्ये व (ज्वारी,बाजरी,मका,चारा पिके) हि तृणधान्ये आणि कापूस सारख्या नगदी पिकांची पेरणी करण्यास सुरवात होते.

ड्रोन फवारणी

वाचा:गहू पिकासाठी ओलीत व्यवस्थापन

kharip crop planning

खरीप पिकाचे नियोजन ( kharip Crop planning ) हे पावसावर देखील अवलंबून असते बदलत्या वातावरणामुळे बऱ्याचशा भागात पेरण्या वेळेवर होत नसल्यामुळे नियोजनाचे तंत्र बिघडते.काही भागात पाऊस लांबणीवर गेल्या मुळे १५ जुलै पर्यंत पेरणी होत नाही अशा वेळी आपत्कालीन पिक नियोजनाचे तंत्र शेतकरी बांधवा पर्यंत पोहचणे गरजेचे असते.

हेही वाचा:उन्हाळी भुईमुग शाश्वत लागवड पद्धती


पिक पेरणी नियोजन पावसाच्या आगमनानुसार

पेरणीचा कालावधी कोणती पिके घ्यावी
१) १५ जुलै पर्यंत पावसाचे आगमन झाल्यास पुढील पिकांची निवड करावी. सोयाबीन,कापूस,संकरीत ज्वारी,संकरीत बाजरी,तूर,सुर्यफुल,तीळ.(आंतरपीक – बाजरी + तूर ,सुर्यफुल +तूर ,सोयाबीन +तूर ,गवार + तूर )
२) १६ जुलै ते ३१ जुलै पर्यंत पावसाचे आगमन झाल्यास पुढील पिकांची निवड करावी.सुर्यफुल,तूर,हुलगा,एरंडी,बाजरी,तीळ(आंतरपीक – सुर्यफुल + तूर ,तूर + गवार , बाजरी + तूर)
३) १ ते १५ ऑगस्ट पर्यंत पावसाचे आगमन झाल्यास पुढील पिकांची निवड करावी.हुलगा, तीळ,तूर एरंड,सुर्यफुल,बाजरी(आंतरपीक – सुर्यफुल + तूर ,एरंडी + दोडका)
४) १६ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट पर्यंत पावसाचे आगमन झाल्यास पुढील पिकांची निवड करावी.सुर्यफुल,बाजरी,एरंडी.
kharip crop planning

पिकांची आंतरमशागत:

खरीप पिकाचे नियोजन ( kharip Crop planning ) करताना पिकांमधील तनाचा नाश करण्यासाठी पिकांची कोळपणी करणे हि एक महत्वाची अंतरमशागत आहे.यासाठी बिनफटीचे कोळपे ,फटीचे कोळपे ,दातेरी कोळपे यांचा वापर कोळपणीच्या कामात करावा.कोळपणीचे काम तिसऱ्या ,पाचव्या व सातव्या आठवड्यामध्ये करावे .कोळपणीमुळे जमीन भुसभुशीत होते जमिनीतील भेगांचे प्रमाण कमी होते.माती मधील कणांचे अच्छादणास मदत होते. बाष्पीभवनाचे प्रमाण कमी होऊन जमितीत ओलावा टिकून राहतो.कोळपणीमुळे तनाचा नाश होतो असे करणे गरजेचे असते कारण तनामुळे ओलावा दीर्घकाळ टिकून राहत नाही. कोळपणी ची वेळ आणि कोळपणी करण्याची कार्यक्षमता याच गोष्टीवर रब्बी पिकांची उत्पादकता देखील अवलंबून असते.


अच्छादन पद्धत:

  • जमिनीतला ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आच्छादनाचा वापर करावा, आच्छादनामुळे जमिनीतील ओलाव्याचे बाष्पीभवन कमी होते.सेंद्रिय पदार्थाचा वापर करणे त्यामध्ये प्रामुख्याने कडी,कचरा,ज्वारीचे धसकट,सुकलेले गवत यासारख्या पदार्थाचे एकजीव मिश्रण करून जमिनीच्या पृष्ठभागावर आच्छादन केल्यास पिकांची उत्पादकता वाढते.
  • सर्वसाधारणपणे पिकांची उगवण झाल्यापासून १५ दिवसाच्या आत सेंद्रिय पदार्थाचे आच्छादन करावे,प्रती हेक्टरी ५ टन सेंद्रिय पदार्थचे आच्छादन पुरेशे असते. असे केल्यास जमीनीला भेगा पडण्याचे प्रमाण कमी होते.अशा पद्धतीने आच्छादन केल्यास ३५-४५ मिली मीटर ओलावा अधिक प्रमाणात उपलब्ध होतो.

संरक्षित पाणी पद्धती:

  • ज्यावेळी पिकांच्या कार्यसाधक मुळाना ओलावा समप्रमाणात प्राप्त होत नाही किवा ओलावा पूर्णपणे नष्ट होतो.अशावेळी उपलब्ध पाण्याचा साठा अत्यल्प असल्यास पिकांना पाणी समप्रमाणात देणे कठीण असते.त्यामुळे शेतकरी बंधूनी पिकांना हलके पाणी देण्याचे नियोजन करावे.
  • खरीप पिकाचे नियोजन ( kharip Crop planning ) यामध्ये अडचण अशी कि १० सेमी पेक्षा कमी पाणी बसने शक्य होत नाही.यावेळी पिके सुकण्यास सुरवात होते त्याच बरोबर जमिनीला भेगा पडायला सुरवात होते व पाणी साठ्यात अत्यल्प पाणी असल्यामुळे हलके पाणी देणे आवशयक असते त्यासाठी शेतकरी वर्गाने तुषार सिंचनाचा वापर करावा, अशा आपत्कालीन परिस्थितीत तुषार सिंचन हे एक फायदेशीर त्याच बरोबर प्रभावी सिंचन पद्धती म्हणून समोर येते

ताण नियंत्रित पद्धती:

kharip crop planning
  • उत्पादकता वाढवण्यासाठी हि एक अत्यंत महत्वाची पद्धती आहे. पाण्याचा ताण पिकाची वाढीव क्षमता व उत्पादकता यावर थेट परिणाम टाकत असतो.वातावरण,वाण,वाढीची अवस्था इत्यादी बाबीवर पिकांची पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता अवलंबून असते.
  • खरीप पिकाचे नियोजन ( kharip Crop planning ) पिकांची /वाणांची सर्वोच्च उत्पादन क्षमते पर्यंत पोहचण्यासाठी गरज असेल तेवढी मात्रा व आवशयकता असेल त्यावेळी पाणी देणे गरजेचे असते.परंतु काही वाणे पाण्याची कमतरता असेल तरी देखील जुळवून घेतात व भरपूर उत्पादन क्षमता प्रदान करतात.अशा वाणांची निवड करणे यावेळी गरजेचे ठरते.
  • प्रामुख्याने आपत्कालीन परिस्थितीमध्ये पाण्याची उत्पादकता वाढवणे गरजेचे असते,ज्या ठिकाणी/भागात पाण्याची टंचाई असते त्या भागातील शेतकरी मालाला नियंत्रित ताण देण्याची पद्धती अवलंबताना दिसत आहे.
  • बाहेर देशातील शेतीकडे बघता उदा:इज्रईल,क्यालिफोर्निया मधील शेतकरी कमी पाण्याचा वापर करून भरघोस उत्पादन घेतात.पिकांना नियंत्रित पाण्याचा ताण देण्याची पद्धती या लोकांनी अंगिकारली आहे.
  • या पद्धतीमध्ये पिकांना गरजे इतके जास्तीत जास्त पाणी न देता,पिके मारणार नाही एवढ्याच प्रमाणात पाण्याचा पुरवठा केला जातो.निश्चितच या पद्धतीमध्ये उत्पादनात थोड्या प्रमाणात घट होते परंतु या पद्धतीचा भर हा पिकांचे उत्पादन वाढवणे यावर नसून पाण्याची उत्पादकता वाढवणे त्याच बरोबर पाण्याची कार्यक्षमता जास्त काळ टिकवून ठेवण्यावर असतो.

ठिबक सिंचनाद्वारे फळझाडना पाणी पुरवठा:

पाणी कमतरतेच्या कालावधीत ठिबक सिंचनाची पद्धत जगात प्रसिद्ध आहे. ५० % पर्यंत पाण्याची बचत हि ठिबक सिंचनातून होत असते.यातून नेहमीच्या पद्धतीपेक्षा दुप्पट क्षेत्र हे सिंचनाखाली आणणे सोपे होते.परंतु आपत्कालीन परिस्थितीत ठिबक सिंचनाद्वारे प्रचलित पद्धती नुसार पाणी द्यावयाच्या मात्रे पेक्षा १०-२० % पाणी कमी देऊन सुद्धा दुप्पट शेत्रापेक्षा जास्त शेत्र सिंचनाखाली आणणे प्रामुख्याने फळझाडे व भाजीपाला या पिकांना ठिबक सिंचनाखाली पाणी पुरवठा करून जास्तीत जास्त पिकांची उत्पादकता व निव्वळ उत्पन्न मिळवणे सहज शक्य होते.


परावर्तकांचा वापर:

झाडाच्या पानान कडून सूर्याच्या उष्णतेमुळे खूप जास्त प्रमाणात पाणोत्सर्जन होत असते.खरीप पिकाचे नियोजन करताना अशावेळी पाणोत्सर्जन निरोधाकानंचा वापर करणे अतिशय फायद्याचे ठरते.यामध्ये प्रामुख्याने व्यक्सी,केओलीन इत्यादीचा वापर केल्यास पाण्यची बचत होण्यास व दोन पाण्याच्या पाळ्या मधील अंतर जास्त काळ ठेवण्यास मदत मिळते.

पिकांना पाणी देण्याच्या अवस्था:

  • आपत्कालीन परिस्थिती मध्ये जसे कि,पाऊस वेळेवर पडला नसल्यास खरीप पिकांचे नियोजन करत असताना आपल्या कडे उपलब्ध पाणी साठ्यातून पिकांचे नियीजन करणे आवश्यक असते.( kharip Crop planning ) यामध्ये प्रामुख्याने लक्ष देण्याची गरज असते कारण पिकांच्या संवेदनशील अवस्थेत पिकांना पाणी पुरवठा होणे गरजेचे आहे.पिकांची गरज ओळखून पिकांना पाणी देणे महत्वाचे ठरते.
  • सर्वसाधारणपणे पिकांना त्यांच्या संवेदनशील अवस्थेत योग्य तो पाणी पुरवठा होणे अत्यंत गरजेचे आहे.ज्यामध्ये प्रामुख्याने दाने भरण्याच्या काळात त्याच बरोबर पिकांमध्ये फुलोरा येण्याच्या काळात पाण्याची टंचाई पिकांना होणार नाही ह्याची दक्षता शेतकरी बंधूनी घ्यावी.
  • अशा संवेदनशील परिस्थिती मध्ये पाणी देणे महत्वाचे ठरते,त्यामुळे पाण्याची काटकसर करणे सोपे जाते.सध्या परिस्थितीत बहुतांश पिकांची संवेदनशील अवस्थेबद्दल माहिती सर्वत्र उपलब्ध आहे.खरीप पिकांचे नियोजन करताना त्याप्रमाणे पिकांना पाणी दिल्यास,पाण्याची बचत करता येईल त्याच बरोबर उत्पादनात वाढ करता येईल.

पिकांच्या पाणी व्यवस्थापनाचा पद्धतीचा तक्ता पुढे दिलेला असून खरीप पिकांचे नियोजन करत असताना पिक वाढीच्या महत्वाच्या अवस्थेनुसार पाण्याची गरज दर्शविली आहे.शेतकरी बंधूनी या पद्धतीचा अवलंब केल्यास निश्चितच पाणी व्यवस्थापनामध्ये फायदा होईल:

पिकाचे नावपिकांच्या वाढीच्या अवस्था/पेरणी पासूनचे दिवस पाण्याची आवश्यकता
(सेमी)
पाण्याच्या एकूण पाळ्या
१.सुर्यफुल १) रोप अवस्था/१५-२०
२) फुलकळ्या येण्याची अवस्था/३०-३५
३)पिक फुलावर असताना/४५-५०
४)दाने भरण्याची अवस्था/६०-६५
३०-३५
२.सोयाबीन १)वाढीच्या अवस्था/३०-३५
२)फुलोरा येण्याची अवस्था/४५-५०
३)शेंगा भरण्याची अवस्था/६०-७०
२६-३२
३.तूर १)पेरणीची वेळ/३५-४०
२)फांद्या फुटण्याची अवस्था/६५-७०
३)फुले येण्याची अवस्था/१००-१०५
४)दाने भरण्याची अवस्था/१२०-१२५
४०-४५
४.ज्वारी १)गर्भावस्था/२८-३०
२)पिक पोटरीतील अवस्था /५०-५५
३)पिक फुलोरा अवस्था/७०-७५
४)दाने भरण्याची अवस्था/९०-९५
४०-५०
५.मका १)रोप अवस्था २५-३०
२)तुरा बाहेर येणारी अवस्था/४५-५०
३)शेंगा भरण्याची अवस्था /६५-७०
४०-४५
६.बाजरी १)फुटवे येण्याची अवस्था/२५-३०
२)पिक फुलोरा अवस्था/५०-५५
२५-३०
७.कापूस उन्हाळ्यात १० दिवसांनी व त्यानंतर १५ दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे. ७०-८० ८-१०

जमिनीतल अन्न व पाणी यांची बचत करण्यासाठी रोपांची विरळणी करणे गरजेचे असते,याद्वारे रोपे अन्न व पाणी इतर रोपांना मिळते व रोपे पाण्याचा ताण सहन करण्यास सक्षम होतात.

kharip crop planning

खतांचा वापर:

पावसाची अनियमितता खरीप हंगामात पिकांवर विपरीत परिणाम करत असतात. जमिनीतील ओलावा कमी होतो असल्यामुळे पिके कोमाजण्यास सुरवात होते. याचा थेट परिणाम झाडाच्या पानांवर होतो व पानांचे तापमान वाढण्यास सुरवात होते.

झाडाच्या कार्यसाधक मुळामध्ये पाण्याची वाफ जाण्यास सुरवात होते त्यामुळे झाडांची अन्न तयार करण्याची प्रक्रिया मंदावण्यास सुरवात होते.खरीप पिकांचे नियोजन करत असताना अशा आपत्कालीन परिस्थितीत कृषी संशोधक पुढील उपाय करण्याच्या सूचना देत आहे.त्या पुढील प्रमाणे: (युरिया २ % + झिंक सल्फेट ०.५ % + पोटॅशियम नायट्रेट 1 %) यांचा फवारा योग्य त्या पिकासाठी फवारावे.

यामुळे झाडांच्या पानांमधील अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेला चालना मिळते व क्रिया गतिमान होण्यास सुरवात होते.या पद्धतीचा वापर केल्यास पिके जमिनीतील ओलावा सोशून घेण्यास सुरवात करतात हि कामे प्रामुख्याने पिकांच्या संवेदनशील अवस्थेत करणे बंधनकारक आहे.


वाफसा पद्धती:

( kharip Crop planning )

  • वाफसा : पिकांच्या मुळाना पाणी हवे हि संकल्पना चुकीची आहे. जमिनीत असणारी ५०% पाण्याची वाफ व ५०% हवा ह्यांच्या मिश्रणास वाफसा म्हणतात .पाण्याचा वापर जास्त केल्यास मुळाना फायटोपोथोरो बुरशी लागते त्यामुळे मुळे सडतात .म्हणूनच पिकांच्या मुळाना वाफसा पाहिजे असतो .
  • वाफसा तयार कसा करायचा :कोणत्याही झाडाची दुपारी बारा वाजता पडणारी सावली त्या सावलीच्या शेवटच्या टोकावर वाफसा आणि अन्न घेणारी मुळे असतात त्या मुळाच्या ६ इंच बाहेर पाणी दिल्यास मुळे स्वतः हवे तेव्हा वाफसा घेतात .
  • कसे कराल :खरीप पिकांचे नियोजन करत असताना यावर उपाय कराचा झाल्यास झाडाच्या सावली पासून ते खोडा पर्यंत उतार काढला तर पावसाचे व सिंचनाचे पाणी ताबडतोब बाहेर निघेल व मुळ्या सुरक्षित राहतात .
  • सावलीच्या ६ इंच बाहेर सरी काढल्यास त्यातूनसिंचनाचे पाणी दिल्यास फळझाडावर मर किवा डीक्या रोग येत नाही असे केल्यास मुळा जवळ वाफसा तयार होतो .

पिकांचे तेज चांगले ठेवण्यासाठी व पिकांच्या मुळाना पाण्याचा ताण सहन करण्यास सक्षम बनवण्यासाठी वरील उपाय फायदेशीर ठरतो.

Visit Dr.pdkv official website