Chief Minister Agriculture And Food Processing Scheme Maharashtra :
CM Agriculture And Food Processing Scheme:महाराष्ट्रात २०१७-१८ पासून मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना राबवण्यास सुरवात झाली असून २०२२-२३ च्या सरकारी ठरावानुसार हि योजना पुढे ५ वर्षा करिता म्हणजेच २०२६-२७ पर्यंत चालू ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.ह्या योजनेंतर्गत अन्नप्रक्रिया उद्योग प्रकल्पासाठी राज्य सरकार कमाल ५० लाख रुपयापर्यंत अनुदान देण्याचे ठरविण्यात आले ज्याचे नाव CM Agriculture And Food Processing Scheme असे आहे.ह्या योजनेचे उद्दिष्ट कृषी व अन्न प्रक्रिया उद्योग स्थापन करणे त्याच बरोबर आधीपासून कार्यरत असलेल्या कृषी व अन्नप्रक्रिया उद्योगाचे विस्तारीकरण,स्तरवृद्धीकरण व आधुनिकीकरण करून कृषी व अन्नप्रक्रिया उद्योग क्षेत्राचा विकास करणे हा आहे.

मोठ्या उद्योगामध्ये आपल्या देशात ५ व्या क्रमांकावर अन्न प्रक्रिया उद्योग येत असून वेगाने होणारे शहरीकरण,देशाला लाभलेलि सर्वाधिक युवा लोक संख्या,आधुनिकीकरण इत्यादी बाबीमुळे मनुष्याच्या दैनंदिन सवयींमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत चालला आहे.सरकारने चालवलेल्या शासकीय धोरणांमुळे आयात निर्यात क्षेत्रात मोठ्या प्रमाणात लवचिकता दिसू लागली आहे.ह्याचा फायदा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पणे अन्नप्रक्रिया उद्योगांना होत आहे. युवा शेतकऱ्याना मोठ्या प्रमाणात संधी सध्याच्या काळात उपलब्ध होत आहे.
फळबाग योजनेवर १०० % सबसिडी ! संधी सोडू नका.
anna prakriya yojana महाराष्ट्रात कृषी व कृषी सलग्न क्षेत्राशी राज्याची ६५ % लोकसंख्या जोडली गेलेली आहे.महाराष्ट्रातील पिक उत्पादनाचा विचार केल्यास प्रामुख्याने भात,बाजरी,ज्वारी,गहू,मका,नाचणी,यासारखी तृणधान्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते.त्याचबरोबर तूर,मुग,उडीद,हरभरा,व इतर कडधान्य पिकाचे उत्पादन होते.सुर्यफुल,भुईमुग,करडई,मोहरी ह्यासारखी तेलबिया पिके.मिरची, हळद, आले,धने, यासारखी मसाला पिके व ऊस ह्यासारखी नगदी पिके महाराष्ट्रात घेतली जातात.पालेभाज्या व फळउत्पादनात देखील महाराष्ट्राचा क्रमांक देशात अव्वल स्थानी येतो.परंतु ह्यातील काही पिके नाशवंत असल्यामुळे आंबा,केली,द्राक्ष,पेरू,संत्री,डाळिंब,काजू,तृणधान्य,कडधान्य आणि तेलबियावर अन्नप्रक्रिया करणे आवश्यक असते.
वाचा:५ लाखापर्यंत कर्ज ! किसान क्रेडीट कार्ड ठरणार वरदान
राज्यात विविधांगी पिके,फळपिके,यांचे उत्पादनपातळी अव्वल स्थानी असली तरी काढणीपश्चात पायाभूत सुविधांचा अभाव,प्रक्रिया उद्योगाची कमतरता इत्यादी बाबीमुळे मोठ्या प्रमाणात अन्नची नासाडी होत असते.हे टाळण्यासाठी महाराष्ट्र सरकार सातत्याने प्रयत्न करीत असून याद्वारे अन्नप्रक्रिया उद्योगास चालना देण्यासाठी २० जून २०१७ पासून राज्यात मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना जी कि १०० % राज्य पुरस्कृत योजना चालू करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजनेचे उद्दिष्टे :
CM Agriculture And Food Processing Scheme
- अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प उभारून कृषी उत्पादनात शेतकऱ्यांच्या सहभागाद्वारे मुल्यवर्धनाला प्रोत्साहन देणे.
- मॉडेल तंत्रज्ञानावर आधारित अन्नप्रक्रिया प्रकल्पांना प्रोत्साहन देणे आणि कृषी उत्पादनाची गुणवत्ता सुधारणे,कृषी मालाच्या निर्यातीला प्रोत्साहन देणे,कौशल्यपूर्ण मनुष्यबळाची निर्मिती करून कृषी व अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये त्यांना रोजगार निर्माण करून देणे.
- ग्रामीण भाग मध्ये लघु व मध्यम उद्योग व अन्न प्रक्रिया युनिट्सद्वारे रोजगार निर्मिती उपलब्ध करणे.
हेही वाचा :२०२५ माझी लाडकी बहिण योजनेत मोठे बदल !
- तृणधान्य,कडधान्य,तेलबिया,फळे,भाजीपाला,मसाला पिके, औषधी व सुगंधी वनस्पती, दुग्ध व पशुखाद्य प्रकल्प,इत्यदी बाबी मध्ये शेतमालाचे मूल्यवर्धन आणि शेतमालाच्या गुणवत्तेमध्ये वाढ करण्यासाठी शेतकऱ्याना आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित अन्न प्रक्रिया प्रकल्प उभा करून देणे.
- त्याचबरोबर आधीपासूनच कार्यरत असलेल्या अन्नप्रक्रिया प्रकल्पाचे आधुनिकीकरण करून प्रकल्प उद्योगाची स्तरवृद्धी ,विस्तारीकरणास प्रोत्साहन अर्थसाहाय्य देणे.
- पिक समूह आधारित प्रक्रिया प्रकल्पामध्ये संबंधित मुल्यसाखळी विकसित करण्यासाठी अर्थसहाय्य देणे.
- अन्नप्रक्रिया उद्योगामध्ये विस्तारीकरण करावयाच्या बाबीमध्ये मशनरी हि आधुनिक व जास्त उत्पादन त्याच बरोबर उत्तम प्रतीचा माल उत्पादित करणारी असावी फक्त जुनी मशनरी बदलवून त्याचप्रकारची परत मशनरी लावत असल्यास अर्थ सहाय्य दिले जाणार नाही.
मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजनेचे फायदे :

Anna prakriya yojana
- कृषी व अन्नप्रक्रिया युनिट्स स्थापन करणे, आधीपासून कार्यरत प्रकल्पाची स्तरवृद्धी करणे आणि आधुनिकीकरण करणे.
- मूल्यवर्धन,शीतसाखळी व साठवणुकीच्या पायाभूत सुविधामध्ये सुधारणा करणे.त्यामध्ये पिक आधारित अन्न प्रक्रिया उद्योगाशी संबंधित काढणी पश्चात पूर्व प्रक्रिया केंद्र यामध्ये एकात्मिक शीतसाखळी निर्माण करणे
- तृणधान्य,कडधान्य,तेलबिया,फळे,भाजीपाला,मसाला पिके,औषधी व सुगंधी वनस्पती, दुग्ध व पशुखाद्य प्रकल्प इत्यादी बाबी मध्ये आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित अन्न प्रक्रिया प्रकल्प उभारणे विशेषतः तृणधान्यच्या प्रकल्पांना प्राधान्य दिले गेले आहे.
योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो :
वैयक्तिक लाभार्थी:
- वैयक्तिक उद्योजक
- शेतकरी
- बेरोजगार युवक
- महिला
- नवउद्योजक
- अग्रीगेटर
- भागीदारी प्रकल्प
- भागीदारी संस्था(LLP)
- महाराष्ट्र शासनाच्या कुटुंब संज्ञेनुसार (पती,पत्नी व अपत्ते) यामध्ये एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला लाभ घेता येईल व अर्जदारस एकदाच ह्या योजनेचा लाभ घेता येईल.
गट लाभार्थी:
- शासकीय संस्था
- खाजगी संस्था
- शेतकरी उत्पादक कंपनी/गट/संस्था
- स्वयं सहाय्यता गट
- उत्पादक सहकारी संस्था
मुख्यमंत्री कृषी व अन्नप्रक्रिया योजना पात्रता निकष :
Chief Minister Agriculture And Food Processing Scheme Maharashtra
Anna prakriya yojana
१) लाभार्थी व्यक्तीचे वय १८ वर्षा पेक्षा अधिक असणे बंधनकारक आहे.
२) लाभार्थी व्यक्तीकडे आधार कार्ड/पॅन कार्ड असणे बंधनकारक आहे.
३) लाभार्थी व्यक्तीचा सिबिल स्कोर चांगला असावा.
४) लाभार्थी व्यक्ती कडे ७/१२ प्रमाणपत्र व ८-अ प्रमाणपत्र किंवा भाडेपट्टा कागदपत्रे असणे बंधनकारक राहील.
मुख्यमंत्री कृषी व अन्नप्रक्रिया योजना आवश्यक कागदपत्रे :
CM Agriculture And Food Processing Scheme
- लाभार्थ्याचा अर्ज (विहित नमुन्यातील)
- बँकेचे कर्ज मंजुरी प्रमाणपत्र
- बँकेने केलेले मुल्याकन
- ७/१२ ८-अ(मूळ) किंवा करार
- अर्जदाराचे आधार कार्ड/पॅन कार्ड/फर्म चे पॅनकार्ड
- उद्योग नोंदणी प्रमाणपत्र
- प्रकल्प अहवाल(DPR) प्रकल्पाचा तपशील(मूळ)
- प्रकल्पाच्या प्रक्रियेचा फ्लो चार्ट
- प्रकल्पाच्या विस्तारीकरणासाठी, सध्यास्थितीच्या मशनरी व विस्तारीकरणातर्गत प्रस्तावित मशनरी याचा संपूर्ण तपशील प्रकल्प अहवाल करणे आवश्यक राहील.
- प्रकल्प बांधकामासाठी नोटरीकृत करार सादर करणे बंधनकारक
- बांधकामाची ब्लू प्रिंट(बँक प्रमाणित)
- यंत्र सामग्रीचे कोटेशन (बँक प्रमाणित)
- प्रकल्प पूर्ण व्यवहार्यता अभ्यास अहवाल.
- जिल्हास्तरीय प्रकल्प अमलबजावणी समितीचे शिफारस पत्र.
- स्तरवृद्धी,विस्तारीकरण व आधुनिकीकरण करावयाचे असल्यास मागील ३ वर्षाचे लेखा परीक्षण अहवाल जोडणे बंधनकारक राहील.
योजनेचा अर्ज कुठे करावा :
जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयात अर्ज सादर करावा,बँकेतून कर्ज मंजूर होताच तत्काळ अर्ज करावा.
अन्न प्रक्रिया प्रकल्पासाठी बँकेतून कर्ज घेणे बंधनकारक आहे कारण क्रेडीट लिंकड बँक एन्डेड सबसिडी ह्या स्वरुपात अनुदान मिळते.मंजूर झालेल्या अनुदानाच्या किमान दीड पट कर्जाची रक्कम असणे बंधनकारक राहील.
अनुदान मंजुरीसाठी पात्र बँका :
Chief Minister Agriculture And Food Processing Scheme Maharashtra
- भारतीय रिझर्व बँकेने (RBI) योजनेसाठी कर्ज देण्याची मान्यता दिलेल्या सर्व बँका.
- राष्ट्रीयकृत बँका
- शेडूल्ड बँका
- व्यापारी बँका
- प्रादेशिक ग्रामीण बँका
- वित्तीय संस्था
अनुदान किती दिले जाते :

Anna prakriya yojana
प्रक्रिया प्रकल्पासाठी आवश्यक दालने,कारखाना,मशनरी यावर होणाऱ्या खर्चाच्या ३० % अनुदान दिले जाते. कमाल ५० लाख रुपया पर्यंत अनुदान दिले जाते.
संपूर्ण प्रकल्प खर्चाच्या कारखाना व मशनरी साठी किमान ६० टक्के व बांधकाम खर्चाच्या ४० टक्के खर्च अनुदानासाठी विचारात घेतला जातो.
अनुदान हे दोन समान टप्यात दिले जाते त्यामध्ये पहिला टप्पा हा प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण झाल्यावरचा असतो तर दुसरा टप्पा हा प्रकल्पाचे उत्पादन पूर्ण क्षमतेने सुरु झाल्यावर असतो.
केंद्र व राज्य सरकारने नमूद केलेल्या आराखड्यानुसार नमूद केलेल्या या योजनेंतर्गत अनुदान दिले जाईल.तथापि योजनेंतर्गत दिलेल्या बाबीवर लाभ घेतला असल्यास परत इतर कोणत्याही योजनेमधून अनुदान घेता येणार नाही
सतत विचारले जाणारे प्रश्न | FAQ
CM Agriculture And Food Processing Scheme
प्रश्न १) अन्न प्रक्रिया उद्योग कोणकोणती सुरु करता येईल ?
उत्तर- भाज्या,फळे,तेलबिया,धान्य,डाळी,मसाले,औषधी व सुगंधी वनस्पती इत्यादी प्रकारचे अन्न प्रक्रिया उद्योग सुरु करता येईल व दुग्ध आणि पशुखाद्य प्रकल्प चालू करता येतो.
प्रश्न २) हि योजना राज्य पुरस्कृत योजना आहे का ?
उत्तर- हो हि १०० % राज्य पुरस्कृत योजना आहे.
प्रश्न ३) या योजनेसाठी सामाईक शेती असलेले शेतकरी अर्ज करू शकतात का ?
उत्तर- हो ,असे शेतकरी देखील अर्ज करू शकतात.
प्रश्न ४) एकाच घटकाला सलग वर्षामध्ये लाभ घेण्याची परवानगी आहे का ?
उत्तर- नाही, ज्या घटकाचा लाभ घेतला आहे त्याची पुनरावृत्ती ७ वर्ष करता येणार नाही.
CM Agriculture And Food Processing Scheme
प्रश्न ५) योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे करावा ?
उत्तर – अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑफलाईन करण्यात आली असून जवळच्या कृषी विभागाशी संपर्क साधू शकता.
प्रश्न ६) शेतकरी असल्यास बँकेचा तपशील आवश्यक आहे का ?
उत्तर – हो, अनुदान हे क्रेडीट लिंकड बँक एन्डेड सबसिडी च्या आधारावर दिले जाते.
Chief Minister Agriculture And Food Processing Scheme Maharashtra
प्रश्न ७) एका अर्ज मध्ये किती घटकांचा वापर करू शकतो ?
उत्तर- एकच घटकासाठी अर्ज करू शकतो.
प्रश्न ८) योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज शुल्क आकारला जातो का ?
उत्तर- नाही कुठ्याली प्रकारचे शुल्क आकारले जात नाही .
प्रश्न ९) अन्नप्रक्रिया उद्योग कुठलाही असला तरी योजनेसाठी अर्ज कार शकतो का ?
उत्तर- हो
प्रश्न १०) शेती साठी अन्न प्रक्रिया उद्योग का महत्वाचा आहे ?
उत्तर – हे अन्न पिकांचे शेल्फ लाइफ वाढवण्यास मदत करते. अन्न दुषित होण्याचे प्रमाण पूर्णपणे नाहीशे करते,अन्न उत्पादनांना विक्री योग्य बनवते .
शेतकरी बांधवांसाठी महत्वाचे लेख :
ऊस लागवडीत यशस्वी व्हायचंय ? मग हे वाचाच!
सेंद्रियशेती जागतिक बाजारपेठेत मोठी मागणी
फक्त १० मिनिटात प्रती एकर फवारणी
CM Agriculture And Food Processing Scheme pdf