Zinc in agriculture|पिक उत्पादनात ५०% वाढ करा

Zinc use in agriculture in Marathi:

Zinc in agriculture:भारतामध्ये २००८ पासून जस्ताची कमतरता जाणवायला लागली यामध्ये २००८ मध्ये ती ४०% होती त्यानंतर २०१२ पर्यंत ५१% वर जस्ताची कमतरता दिसू लागली सध्या परिस्थिती बघता महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जस्ताची कमतरता ७० ते ८०% पर्यंत वाढली असल्याचे निदर्शनास आले. Zinc in agriculture|जस्त अन्नद्रव्याचे महत्व हि एक गंभीर बाब असून शेतकरी मित्रांनी उत्पादनवाढी साठी जस्ताची कमतरता भरून काढणे हि आजच्या काळाची गरज झाली आहे.शेतकरी बंधुनो जस्ताच्या कमतरतेची लक्षणे सहसा निदर्शनास येत नाही परंतु उत्पादनाचा विचार केल्यास ५० % पर्यंत घट पिक उत्पादनात होते.जमिनीच्या सुपीकतेसाठी अत्यंत महत्वाचे अन्नद्रवे आहे पिक पोषणासाठी याचे महत्व सर्वाना माहित आहे.

ड्रोन फवारणी

Zinc in agriculture|जस्त अन्नद्रव्याचे महत्व भारतातील कित्येक राज्यात जस्ताची कमतरता जाणवायला लागली आहे.मातीची सुपीकता टिकून ठेवण्यासाठी तसेच पिकांच्या वाढीसाठी जस्ताची गरज असते.याचा थेट परिणाम उत्पादनावर होत असून शेतकरी बंधूनी यावर लक्ष देणे अत्यंत गरजेचे झाले आहे.जमिनीच्या सुपीकतेसाठी,नत्र,पलाश,स्फुरद,यांचे जितके महत्व आहे त्याच प्रमाणे जस्ताचे देखील तितकेच महत्व असते परंतु रासायनिक पद्धतीचा अवलंब शेतीमध्ये वाढत चालला असून त्याचा थेट परिणाम जमिनीच्या सुपिकतेवर होताना दिसतो.त्यामुळे पिकांचे पोषण परिपूर्ण होत नाही आणि शेवटी सर्वतोपरी प्रयत्न करून सुद्धा उत्पनात वाढ होताना दिसत नाही.

वाचा:केळीची शाश्वत लागवड पद्धती

Zinc in agriculture

जस्त अन्नद्रव्याचे महत्व: जस्त हे एक महत्वाचे सुश्म अन्नद्रव्ये असून ज्या ठिकाणी भात,गव्हाची लागवड केली जाते त्या ठिकाणी जस्ताची कमतरता अधिकाधिक आढळून आली आहे. पिक पोषणासाठी जस्ताचे प्रमाण कमी लागत असले तरी त्याचे महत्व इतर अन्नद्रव्या इतकेच महत्वाचे असते.भाताचे पिक घेत असताना खैर रोगाचा प्रादुर्भाव आपण जाणवत असतो याचे प्रमुख कारण म्हणजे जस्ताची कमतरता हेच आहे.जस्त हे एक सुश्म अन्नद्रावे आहे पिकांचे जीवनचक्र सुरळीत चालवे यासाठी सुश्म अन्नद्रव्याची गरज असते.

हेही वाचा:नैसर्गिक शेती पद्धती


पिक वाढीसाठी जस्त अन्नद्रव्याचे महत्व:

Zinc in agriculture

  • जस्त हे पिकवाढी साठी संजीवके निर्माण करत असतात. जस्त पिकवाढी साठी अत्यंत महत्वाचे आहे.
  • पिक वाढी साठी प्रकाश संशेल्षण गरज असते,पिकांना प्रकाश संशेल्षनाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ऑक्सिज, इंडोल अ‍ॅसिटिक आम्ल इत्यादीची गरज असते यांचे संतुलन व्यवस्थित ठेवण्यासाठी जस्ताची गरज पिकांना असते.
  • नत्र,पलाश,कर्बोदके वाढीसाठी जस्ताची गरज असते.
  • जमिनीची जालधारण क्षमता वाढवण्याचे कार्य जस्त करते.
  • बहुपीक पद्धती,वाढती बागायती पद्धती त्याच बरोबर पिकांची फेरपालट नकरणे,शेणखत,भरखते,सेंद्रिय खतांचा कमी वापर इत्यादी कारणांमुळे जमिनीची सुपीकता घाटात चालली आहे,पिक घेण्याच्या पद्धतीमध्ये शाश्वत पद्धतीचा अवलंब केल्या जात नाही त्यामुळे जस्ताच्या प्रमाणा बरोबर इतरही अन्नद्रव्याचे प्रमाण पुढील काही वर्षात कमी होण्याचा धोका निर्माण होत आहे जस्त अन्नद्रव्याचे महत्व याकडे शेतकरी बंधूनी गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे ,जगाला अन्न धान्याचा पुरवढा करण्याची जबाबदारी शेतकरी वर्गावर असून वाढत्या लोकसंख्येमुळे अन्नाची कमतरता उद्भवण्याची शक्यता आहे.

ऊस लागवडीत यशस्वी व्हायचंय ? मग हे वाचाच!

जस्ताचे प्रमाण कमी होण्याची करणे:

Zinc in agriculture

१) सुश्म अन्नद्रव्याचे प्रमाण आधुनिक शेतीमुळे कमी कमी होत चालले आहे.

२) जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी संकरित वाणांचा वाढता वापर यामुळे जस्ताचे अधिक शोषण होते.

३) भरखते, सेंद्रिय खतांचा कमी वापर.

४) पिकांची फेरपालट होत नसल्यामुळे एकाच अन्द्रव्याचे अधिक शोषण.

५) जमिनीतील सेंद्रिय कार्ब ची कमतरता यामुळे जमिनीच्या आरोग्यावर होणारा परिणाम.

६) जमिनीमध्ये नखडीचे प्रमाण अधिक असल्यास जस्ताची कमतरता जाणवते.

७) शारयुक्त व चोपण जमिनीत जस्ताचे प्रमाण कमी असते.

८) जमिनीत स्फुरद, लोह,तांबे,चे प्रमाण अधिक असल्यास जस्ताची कमतरता असते.

९) उत्पादन वाढीसाठी रासायनिक खतांचा अतिरेकी वापरामुळे जस्ताची कमतरता आढळून येते.


जस्त कमी प्रमाणाची लक्षणे:

कापशीवरील रोगांचे १०० % नियोजन

Zinc in agriculture

Zinc in agriculture

शेतकरी बंधुनो,जस्ताच्या कमतरतेची लक्षणे सहसा निदर्शनास येत नाही परंतु उत्पादनाचा विचार केल्यास ५०% घट पिक उत्पादनात होते.

१) पानगळीचे प्रमाण वाढते ,पाने वाढीचा वेग मंदावतो,,पाने लहान येतात.

२) हरीतद्र्व्याचा अभाव पानात दिसू लागतो. जुनी पाने शिरामधील भाग पिवळा पडतो व शिरा हिरव्याच दिसतात.

३) पानांवर ठिकठिकाणी ठिबके दिसू लागतात,पाने जळतात.

४) फळे अपरिपक्व राहतात व त्यांचा आकार लहान होतो.

५) झाडांची परिपूर्ण वाढ होत नाही.

६) पिके फुलावर येण्यास तसेच फळे परिपक्व होण्यास विलंब होतो.

७) झाडाचा फुलोरा पूर्णत्वास जात नाही.


पिकानुसार दिसून येणारी लक्षणे:

Zinc in agriculture

जस्त अन्नद्रव्याचे महत्व Zinc in agriculture:

१) सोयबीन: झाडे लहान असतानाच कमतरता लक्षात येते.पिकांच्या नसामधील भागात पिवळसरपणा जाणवतो व पाने जळल्या सारखी दिसतात,शेंड्याकडील पाने जुकण्यास सुरवात होते व उत्पादनात कमालीची घट दिसू लागते.

२) कापूस: नवीन पाने येत असताना हरित द्रव्याचा अभाव जाणवतो,पाने छोटी जड आणि खळबळ येतात,पाने पिवळी पडण्यास सुरवात होते व पानांवर गडद काळा रंग दिसू लागतो,कण्याचा आकार असतो त्यामुळे फुलधारणे मध्ये पिकांना अडचण जाणवते.

३) हरभरा: पानाचा आकार लहान होतो व पिवळे होतात व कालांतराने ते गळतात फुले लहान राहून गळतात त्याचबरोबर घाटे सक्षम होत नाही व गळण्यास सुरवात होते.

४) गहू: मुकुटमुळे वाढीच्या वेळेस गहू पिकात हि लक्षणे आढळून येतात.शेंड्या कडून बघता तिसऱ्या पानावर पिवळसर पट्टा तसेच पांढरे डाग दिसू लागतात,पिक्कांच्या आतील शिरा मध्ये हरीत्द्रव्याचा अभाव व पांढरे/कथ्या रंगाचे जळकट डाग दिसतात.दाने भरण्याच्या कालावधीस उशीर होतो व पिके परिपक्व होत नाही.

५) मका: यामध्ये जस्त कमतरतेची लक्षणे मधातल्या पानावर दिसून येते.मका पिकामध्ये पानाच्या कडा प्रथम पिवळसर व नंतर मधात लालसर होतात.त्याच बरोबर पानावर पांढरा पट्टा तयार करतात तेथून पुढे पट्टे जळल्यासारखे दिसतात व दाने परिपूर्ण भारत नाही व कुमकुवत राहतात.

६) धान: जस्त अन्नद्रव्याचे महत्व धान रोवणी नंतर १५ -२० दिवसानंतर अगोदर उगवलेली पाने पिवळी पडतात.पिवळसर कथ्या रंगाचे ठिपके जुन्या पानांवर पडतात,हि ठिपके कालांतराने वाढतात व गडद कथ्य रंग धारण करतात या विपरीत खैरा रोगाची धानाला लागण होते.दाने परिपक्व होण्यास विलंब करतात.

७) लिंबूवर्गीय पिके: या पिकांमध्ये ज्या पानांचीपूर्ण वाढ झाली आहे त्यामध्ये हि लक्षणे दिसून येतात.पानाच्या आतील शिरामध्ये हरीत्द्रव्याची कमतरता दिसू लागते व पाने पिवळसर पडतात.शेंड्या वरची पाने लहान व अरुंद दिसू लागतात,फळ धारणेचे प्रमाण अत्यंत कमी असते व फांद्या मरण पावतात.

शेतकरी बंधुनो,प्रत्येक पिकासाठी सुश्म अन्द्रव्याचे गरज असते. परंतु त्याचे प्रमाण पिकांनुसार बदलत जाते,वेगवेगळ्या पिकांनुसार वेगवेगळी सुश्म अन्नद्रव्याची गरज असते.हे समजून घेणे गरजेचे आहे जस्त अन्नद्रव्याचे महत्व शेतकरी वर्गाने पिक घेताना लागणारे सुश्म अन्नद्र्वे त्याच बरोबर पोषण द्रवे यांचे कार्य व्यवस्थित समजून घेणे गरजेचे आहे.उत्पादनवाढी साठी अचूक प्रमाणात पोषण द्रवे देण्याची गरज असते


जस्ताचा इतर अन्नद्रव्या सोबत वापर:

Zinc use in agriculture in Marathi

१) जस्त X कॅल्शियम/मॅग्नेशियम/पालाश: मातीमध्ये जर कॅल्शियम/मॅग्नेशियम/पालाश यांचे प्रमाण अधिक असल्यास जस्ताची कार्य क्षमता ढासळते व पिकांमध्ये शोषण वहन परिपूर्ण होत नाही.चुनखडी युक्त जमिनीत जस्तचे पिकाद्वारे शोषण अधिक प्रमाणात करण्यासाठी जिप्सम चा वापर करावा.

२) जस्त X गंधक: जस्त आणि गंधकाचा एकत्रित वापर पिकाचे उत्पादन वाढवण्यास मदत करते.

३) जस्त X तांबे: जमिनीमध्ये जस्ताचे प्रमाण अधिक ठेवण्यासाठी तांब्याचे प्रमाण कमी करणे गरजेचे असते.

४)जस्त X लोह: जमिनीत किवा पिकांमध्ये लोह अधिक प्रमाणात असेल तर जस्ताचे शोषण व वहन कमी कमी होत जाते.

जमिनीतील विविधता त्याच बरोबर जमिनीतील उपलब्ध जस्ताचे प्रमाणानुसार,पिकांचे वाणान मधील फरक लक्षात घेता पिकांमध्ये जस्ताचे शोषण व वहन यामध्ये वेगवेगळा प्रतिसाद बघावयास मिळतो. नत्र ,स्फुरद,पलाश,यांच्या सोबत जर जस्ताचा वापर केल्यास उत्पादनामध्ये ४०% पर्यंत अधिक वाढ होते.असे जस्ताच्या वेगवेगळ्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे.भात,गहू,मका हि पिके जस्ताच्या वापरला (जस्त अन्नद्रव्याचे महत्व) उत्तम प्रतिसाद देत असल्याचे सिद्ध झाले आहे.


जस्ताची कमतरता व सुधारणा:

zinc in agriculture

Zinc in agriculture

उत्पादनात वाढ करण्यासाठी जस्तयुक्त खतांचा वापर करणे अनिवार्य झाले आहे कारण भारतामधील जमिनीत जस्ताची कमतरता देवसेंदिवस वाढत चालली आहे.जस्त अन्नद्रव्याचे महत्व जमिनिद्वारे किवा फवारणीद्वारे जास्तच पुरवठा केला जाऊ शकतो परंतु सर्वोत्तम फायदा होण्यासाठी जस्ताची जमिनिद्वारे पुरवठा करण्यची पद्धती अधिक लाभदायक आहे. पिकांच्या लागवडी आधी किवा पेरणीपूर्वी जस्ताचा वापर करावा.

झिंक सल्फेट चा वापर करणे फायदेशीर ठरते. त्या आधी शेतकऱ्यांनी माती परीक्षण करून घ्यावे त्यामुळे रसायनाचा अचूक वापर साधता येतो.झिंक सल्फेट प्रतिहेक्टरी २०-३० कि.ग्र. जमिनीतून द्यावे.जर तुम्ही फवारणीतून देत असाल तर झिंक सल्फेटची ०.५ – १ % द्रावणाची ज्यावेळी पिक वाढीच्या संवेदनशील अवस्थेमध्ये २-३ वेळा फवारणी करणे गरजेचे असते.

  • जस्त अन्नद्रव्याचे महत्व Zinc in agriculture: कपाशीचे पिक घेत असाल तर त्यासाठी खोल काळ्या जमिनीची निवड करावी तेथील जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्याचे मुल्यांकन तपासणी करून घ्यावी. अशा प्रकारच्या जमिनीत जस्ताची उपलब्धता कमी असल्यास म्हणजे जस्ताचे प्रमाण जर ०.६० मि.ग्र./कि पेक्षा कमी असेल तर झिंक सल्फेट २०-२५ कि/हे कपाशीच्या लागवडी आधी जमिनीत एकजीव करावे.
  • ज्यावेळी कपाशीच्या झाडाला फुले येण्याचा कालावधी असतो त्यावेळी झाडाची पाने पूर्ण विकसित झाली असतात. विकसित झाडाच्या पानामध्ये जर जस्ताचे प्रमाण २१ मि.ग्र./कि पेक्षा कमी असेल तर ०.५ % जस्त सल्फेट + ०.४ % चुना यांचे एकजीव मिश्रण करून फवारावे.
  • सोयाबीन चे पिक जर खोल काळ्या जमिनीत घेत असाल तर सोयाबीन पिकास रासायनिक खतासोबत ५० % नत्र आणि सेंद्रिय पदार्थतून(शेणखत) ५० % नत्र + २० किलो गंधक व २.५ किलो जस्त / हेक्टर या प्रमाणे नियोजन करावे.
  • सोयाबीन पिकाची उत्पादकता वाढवण्यासाठी त्याच बरोबर जमिनीची सुपीकता टिकून ठेवण्यासाठी तसेच नत्र व स्फुरदची कार्यक्षमता वाढवण्यासाठी पुढील उपाय करावा. १ किलो बियाणास (झिंक सल्फेट ९.५ ग्राम + अमोनियम मॉलीब्डेट १.८ ग्राम + कोबाल्ट सल्फेट २.५ ग्राम) यांचे एकजीव मिश्रण करून बीज प्रक्रिया पूर्ण करून पेरणी केल्यास उत्पादनात १०० % वाढ होण्यास मदत होते.

शेतकरी मित्रानो,जस्त अन्नद्रव्याचे महत्व जमिनीत जस्ताचे प्रमान वाढवण्यासाठी सेंद्रिय पदार्थाचा वापर करावा. जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ कमी असल्यास जस्ताचे प्रमाण कमी राहते.सेंद्रिय पदार्थाचा वापर जमिनीची सुपीकता वाढवतात त्याच बरोबर पिकांना पोषक वातावरण निर्माण करतात कारण सेंद्रिय पदार्थ स्वतः जस्त तयार करण्यास सक्षम असतात.

Visit कृषी विभाग