Banana Crop In Maharashtra | केळी लागवडीत यशस्वी व्हायचंय ? हे नक्की वाचा !

Banana Farming In Maharashtra:

Banana Crop In Maharashtra:व्यावसायिक पिक म्हणून महाराष्ट्रात केळीचे उत्पादन घेतले जाते.महाराष्ट्राला केळी लागवडी साठी अनुकूल वातावरण प्राप्त झाले आहे, ९७.५९ हेक्टर जमिनीवर महाराष्ट्र राज्यात केळीचे उत्पादन घेतले जाते कमी वेळात उत्पन घेण्यासाठी सुलभ असे केळीचे पिक आहे परंतु परिपूर्ण माहिती अभावी केळीच्या उत्पादनाचा फायदा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होताना दिसत नाही.Banana Crop In Maharashtra केळीची लागवड करण्यापूर्वी ते पिकांची उत्पादकता वाढवण्यापर्यंत विशेष कळजी घेण्याची गरज असते लागवड प्रक्रिया हि शाश्वत असल्यास केळीतून शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात उत्पन घेऊ शकतात, कुठल्याही पिकांची लागवड करण्यासाठी जमिनीच्या सुपीकते पासून काळजी घेणे गरजेचे आहे किमान एक वर्षा पासून जमिनीचा पोत सुधारण्यास सुरवात केली पाहिजे

Banana Crop In Maharashtra

वाचा ड्रोन फवारणी अनुदान योजना

Banana Crop In Maharashtra-केळ हे उत्कृष्ट आहारमूल्य असणारे फळ असून आणि त्याच्या धार्मिक मूल्यमुळे याचे देशातील बाजारपेठेत मागणीचे प्रमाण वाढत चालले आहे.म्हणूनच उत्पन्न आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील आंब्या नंतर केळीचे महत्व आहे,भारतातून होणाऱ्या फळ निर्यातीमध्ये केळीचे प्रमाण वाढत चालले आहे. दुबई, जापान, मलेशिया,कुवेत, इराण, सौदेअरेबिया व इतर देशात महाराष्ट्रातील केळीची निर्यात केली जाते,Banana Farming जागतिक बाजारपेठेत केळीचे महत्व वाढत चालले आहे.देशभरातून होणाऱ्या केळीच्या उत्पादनापैकी ५०-६०% उत्पादन एकटा महाराष्ट्र घेतो, शेतकरी बंधूनी केळीची निर्यात स्वतःहून करण्याचे कौशल्य विकसित केल्यास उत्पनात दुप्पट वाढ होऊ शकते.

वाचा सोयबीन मार्केट


Banana Crop In Maharashtra शाश्वत पद्धतीने केळीचे उत्पादन कसे घ्यावे या संबंधित माहिती आपण या लेखात घेणार आहोत,संपूर्ण माहिती तज्ञ संशोधकाच्या मार्गदर्शनाखाली दिली जात असून शेतकरी वर्गणी या पद्धतीचा अवलंब केल्यास निश्चितच केळी उत्पादनात वाढ होईल.

VisitDr.PDKV Official Website

जमिनीची निवड कशी करावी:

  • Banana cultivation in Maharashtra केळीची उत्पादन वाढवण्यासाठी जमिनिची सुपीकता अत्यंत महत्वाची आहे. यामध्ये जमिनीची खोली, जमीन मध्यम ते भारी त्याच बरोबर कसदार व पाण्याचा निचरा उत्तम असणारी पाहिजे.जमीन जर शारयुक्त किवा चुनखडीयुक्त असल्यास त्याठिकाणी केळीची लागवड करू नये.
  • ७० से.मि. पर्यंत जमिनीची खोली आवश्यक आहे, ६.५ – ७.५ पर्यंत जमिनीचा सामू असावा.
  • Banana cultivation in Maharashtra साठी मृदेचे परीक्षण करून घ्यावे यामुळे उत्पादनाचा खर्च तसेच खतांचा अचूक प्रमाणात वापर करण्यासाठीचा अंदाज येतो.
  • केळी लागवडी पूर्वी जमिनीची पूर्णपणे खोल नागरणी करावी केळीच्या लागवडीसाठी खडे,सरी आणि गादी वाफ्याचा अलीकडे वापर केल्या जात आहे.
  • गादी वाफ्यामुळे केलेली केळीची लागवड हि अधिक फायदेशीर असल्याचे दिसून आले आहे

दोन झाडां मधील अंतर:

Banana Plantation in Maharashtra

Banana Crop In Maharashtra -पिकांची अंतर मशागत योग्य रित्या व्हावी यासाठी दोन झाडांमधील तसेच दोन ओळीमधील अंतर सुलभ असणे गरजेचे आहे. सूर्यप्रकाश व्यवस्थित झाडापर्यंत पोहचणे हे देखील महत्वाचे असून त्याप्रमाणे दोन झाडामधील अंतर सुनिचीत करावे. त्याआधी कोणत्या वाणाची झाडी लावणार आहोत हे ठरवून घ्यावे.

१) जर तुम्ही बुटक्या झाडाची वाणे लावणार असाल तर:

उदा: श्रीमंती किवा फुले प्राईड १.५ x १.५ मीटर अंतरावर लावावी

२) वाणे जर झाडाची उंची वाढवणारी असतील तर:

उदा: ग्रांडनाईन १.७५ x १.७५ मीटर या पद्धतीने लागवड करावी

पिकांच्या वाण बद्दल थोडक्यत माहिती:

Banana Crop In Maharashtra

Banana Farming in Maharashtra

१) ग्रांडनाईन : या जातीचे फळे याच्या उच्च गुंवातेसाठी व पुरेपूर उत्पन्न देत असल्यामुळे निर्यात शेत्रात अग्र्सेर असतात.या जातीच्या घडात २०० ते २१० फळे लागतात व याला ८ ते १० फण्या असतात.

२) फुले प्राईड: या जातीच्या वनांचे झाड हि बुटकी असतात. झाडे बुटकी असल्यामुळे वाऱ्यापासून होणारा धोका हे सहज टाळू शकतात.यांची झाडे लवकर काढणीस येतात. २० ते २२ किलोचा घड या झाडाचा असतो.करपा आणि सिंगाटोका सारखी रोगांचा प्रादुर्भाव हि वाणे सहज सहन करतात.

३) श्रीमंती वाण: या वाणाच्या फळाची लांबी २० -२२ से.मी. असून घडाचे वजन २३-२५ किलो राहते. १४ते १५ महिने या वाणांचा कालावधी असून हि एक निवड पद्धती मधून तयार केलेली जात आहे.

केळी लागवडीचा हंगाम:

१)Banana plantation in Maharashtra जाने -फेब्रुवारी,जून-जुलै आणि ऑक्टोबर अशी तीन प्रमुख हंगामात केली पिकांची लागवड केली जाते.६५ ते ७०% लागवड हि जून महिन्यात होते या हंगामाला मृगबाग म्हटले जाते.मृगबाग हंगामात लागवड केल्यास अत्याधिक फायदा झाल्यचे निदर्शनास आले आहे.

२) २०-२५ % लागवड हि कांदेबाग हंगामात होत असते या लागवडी ला ऑक्टोबर महिन्यात सुरवात होते.

३) फेब्रुवारी महिन्यात थोड्या प्रमाणात लागवड केली जाते.

निवड व प्रकिया :

  • Banana cultivation in Maharashtra सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे केळी कंदाची निवड करणे. कंदे निरोगी असणे गरजेचे आहे. लागवडीसाठी कंदांची निवड जातिवंत बागेतून करावी. कंदाचे वय ३-४ महिने व वजन ५०० ते ७०० ग्राम च्या आसपास असावे.कंदाची निवड करताना त्याचा आकार उभट किवा नारळा सारखा असावा.
  • लागवडी आधी कंदाचे निर्जंतुकीकरण करणे गरजेचे आहे त्यासाठी पुढील उपाय करावा.(कॅर्बोन्डीझम १०० ग्राम + ॲसिफेट १५० ग्राम +१०० ली पाणी ) या प्रमाणे द्रावण तयार करून ३० ते ४० मिनिटे कंद त्यात ठेवावे.
  • मातीचे परीक्षण आधीच केल्यास अचूक अन्न्द्रावे पुरवण्यास मदत होते,त्यातून उत्पादन खर्च कमी करता येते व अतिरिक्त खतांचा वापर टाळता येतो.लागवडी पासून पहिल्या ५ महिन्यामध्ये रासायनिक खाते देण्यची गरज असते केळीच्या १ झाडास(२०० ग्राम नत्र + ४० ग्राम स्फुरद + २०० ग्राम पलाश) द्यावे.

सुक्ष्म अन्नद्र्व्याचा वापर:

  • कंदांची लागवड झाल्यापासून दुसऱ्या व चौथ्या महिन्यत ईडीटीए जस्त व ईडीटीए लोह यांची प्रत्येकी ५० ग्राम/ १० लिटर पाण्यात टाकून फवारणी करावी.
  • त्यानंतर पाचव्या व सातव्या महिन्यात जमिनीतून १५० ग्राम शेणखतामध्ये फेरस सल्फेट व झिंक सल्फेट यांचे एकत्रित मिश्रण करून मुरवून द्यावे.

पाणी व्यवस्थापन:

केळीच्या पिकासाठी एकूण १८०० ते २२०० मिमी पाण्यची आवश्यकता असते.या पिकासाठी ठिबक सिंचनाचा वापर केल्यास ४० % पर्यंत पाण्याची बचत होऊ शकते. वाढीची अवस्था,बाष्पीभवन,जमिनीतील आद्रता यानुसार केळीच्या पाण्याची गरज थोड्या प्रमाणात वेगवेगळी असू शकते.

महिन्यानुसार पाण्याचे व्यवस्थापन:

Banana cultivation in Maharashtra केळी ह्या पिकासाठी बाष्पपर्णोत्सजनाची आवश्यकता असते. पहिल्या ५ महिन्यापर्यंत ६०% बाष्पपर्णोत्सजनाची गरज असते. ६ -८ महिन्यात ७०% बाष्पपर्णोत्सजनाची गरज असते व ९ ते १२ महिने ८०% बाष्पपर्णोत्सजनाची पूर्तता करावी, शेतामध्ये पाण्याची उपलब्धता कमी असल्यास केळीची उत्पादकता वाढवण्यासाठी मध्यम खोल काळ्या जमिनीची निवड करावी.नियोजणातूनच उत्पादकता वाढवता येते हे लक्षात ठेवावे

बागेची हिवाळ्यात उन्हाळ्यातील काळजी:

उष्णकाटीब्न्धीय वातावरणात (तापमान १० ते ४० अंश) केळीचे पिक होत असते त्यामुळे हिवाळ्यात तापमान १० अंश च्या खाली जात असल्यास केळीला येणारी नवीन पानांचा वेग मंदावतो व झाडाची वाढ देखील खुंटते,रात्रीच्या वेळी ७ ते १० च्या दरम्यान ओले गवत व कडूलिंबाचा पाला-फांद्या यांचा धूर केल्यास उत्पादकता वाढीस मदत मिळते.

Banana Farming in Maharashtra उन्हाळ्यात हवेचे प्रमाण जास्त असल्यामुळे झाडे मोडून पडू शकतात, त्यांना खांबाचा आधार देणे गरजेचे असते.उन्हाळ्यात बाष्पपर्णोत्सजनाची प्रक्रिया वेगात सुरु होते म्हणून १५ दिवसाआड ८% केओलीन फवारणी करणे गरजेचे असते केळीची लागवड करते वेळी शेवरीची लागवड बागेभोवती दोन ओळीत केल्यास उन्हाळ्यात व हिवाळ्यात होणारे बागेचे नुकसान आटोक्यात आणता येते.

केळी रोगांचे व्यवस्थापन:

Banana Crop In Maharashtra

Banana Farming in Maharashtra

  • रोगांचे अचूक व्यवस्थापन करावे प्रामुख्याने कुकुंबर मोझेंक ,सिगाटोका,इर्विनिया रॉट इत्यादी रोगांचा प्रादुर्भाव आढळून येतो.

कुकुंबर मोझेंक: हा एक विषाणुजन्य रोग असून जमिनीतील जीवन द्रवे /हरित द्रवेची मात्रा कमी झाल्यास झाडाची पाने पिवळसर पट्याचे रूप घेतात ह्याचा प्राथमिक प्रसार कंदामार्फात होतो त्याच बरोबर मावा किंडन पासून होत असतो. म्हणूनच लागवडी आधी कंदाचे निर्जंतुकीकरण करणे गरजेचे आहे. कांदांवर रोगाचा प्रादुर्भाव दिसू लागल्यास रोगग्रस्त रोप उपटून टाकावे.बागेमध्ये केळीचे पिक घेत असताना मुग,मक्का,उडीद,टोम्यटो अशी पिके घेण्यचे टाळावे.

इर्विनिया रॉट:Banana Crop In Maharashtra हा एक जीवाणूजन्य रोग असून कंद लागवडीपासून २ ते ४ महिन्याच्या अवस्थेत निदर्शनास येतो इर्विनिया रॉट हा रोग पिकांना कमकुवत बनवतो झाडाचा खालचा बुंधा कुजतो रोगाची लक्षने दिसताच पुढील उपाय करावा:(कॉपर ऑक्सिक्लोराईड ३०० ग्राम + स्टेप्टोसायक्लीन १५ ग्राम + क्लोरोपायरीफॉस ३०० ग्राम +१०० ली पाणी) यांचे एकत्रित मिश्रण करून हि द्रावणे १०० ते २०० मिली या प्रमाणे प्रती झाडास आळवणी करून द्यावे.

सिगाटोका: केळीला लागणारा बुरशीजन्य रोग म्हणून सिगटोकाचा प्रदुर्भाव सातत्यने जाणवतो.तसेच याला करपा असे देखील संबोधले जाते. केळीला या रोगांची लागण झाल्यास केळीच्या पानावर पिवळ्या रंगाचे ठिपके दिसू लागतात.रोगांचे प्रमाण वाढण्यास सुरवात झाल्यास पाने करपतात असे जाणवल्यास पाने पूर्णपणे कापून जाळून टाकावे रोगांच प्रादुर्भाव दिसताच बुरशीनाशक फवारणी राबवणे गरजेचे आहे ती पुढील प्रमाणे करावी:

Banana crop management

१) पहिली फवारणी :(कर्बोडझिम १० ग्राम + स्टीकर १० मिली ) एकत्रित करून फवारणी करावी.

२) दुसरी फवारणी : दुसऱ्या फवारणी आधी रोगांच प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झालेली पाने कापून टाकावी व नंतर फवारणीस सुरवात करावी:(प्रोपीकोन्याझोल १०मिलि + स्टीकर १० मिली ) यांचे मिश्रण फवारावे.

३)तिसऱ्या फवारणी: दुसऱ्या फवारणीच्या २१ दिवसा नंतर तिसरी फवारणी करावी फवारणी आधी रोगग्रस्त पाने काढणे गरजेचे आहे.( कर्बोडझिम ५ ग्राम + मिनरल ओईल १०० मिली + १० ली पाणी )यांचे मिश्रण फवारावे.

४)चौथी फवारणी : तिसऱ्या फवारणीच्या १५ दिवसानंतर करावी रोगग्रस्त पाने काढून टाकावी.(प्रोपीकोन्याझोल ५ मिली +मिनरल ओईल १०० मिली)यांचे मिश्रण करून फवारानी करावी.

केळीची काढणी :

Banana cultivation in Maharashtra केली लागवडीतील सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे काढणी. घडी ज्यावेळी योग्य रित्या पक्वतेला येते त्यावेळी काढणी करणे गरजेचे आहे .पक्व्तेची अवस्था व हाताळणी यावर घडातील फळांचे आयुष्य व फळाची गुणवत्ता अवलंबून असते.काढणीचा निर्णय बाजारपेठेवर अवलंबून असतो, बाजारपेठ दूर असल्यास घडीची पक्वता ७५% असल्यास काढणी करावी व जवळच्या बाजारपेठे साठी घडीची पक्वता ९०% असणे गरजेचे आहे.साधारणता केळ फुल लागल्या पासून ते काढणीपर्यंत १०० ते ११० दिवसाचा कालावधी लागतो,अशा प्रकारे केळीची उत्पादन शास्त्रोत्र पद्धतीने केल्यास शेतकऱ्याच्या उत्पादनात निश्चितच फायदा होईल.