Orchard Fruit Dropping In Marathi:
Orchard Fruit drop:महाराष्ट्रात जमीन पाणी हवामान यांच्या विविधांगी प्रकारामुळे शेतकरी वेगवेगळी पिके घेत असतात फळबागामध्ये हीच परिस्थिती बघावयास मिळते.नैसर्गिक संयोजनानुसार महाराष्ट्रात आंबा, डाळिंब, चिकू, केळी, पपई, पेरू, संत्रा,मोसंबी इत्यादी पिकांची लागवड वेगवेगळ्या भागात केली जाते,या मध्ये केळीचे पिक सर्वात कमी वेळेत उत्पन देते .हिवाळ्यात (Orchard Fruit drop) वेळी फळबागांची फळे जास्त प्रमाणत गळते या मोसामात त्यांची काळजी घेणे महत्वाचे आहे. फळांची मोठ्या प्रमाणात गळत सध्या आपल्याभागात बघयला मिळत आहे यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे.
हेही वाचा:हरभरा घाटे अळीचे व्यवस्थापन

या फळगळतीवर डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने Orchard Fruit dropफळगळतीचे नेमके कारण जाणण्यासाठी संशोधन केले असून त्यावर उपाययोजना सुचविल्या आहे त्या संबंधित संपूर्ण माहिती आपण या लेखात बघणार आहोत .
Visit Dr.pdkv Official website
फळगळतीची प्रमुख करणे :
फळगळतीमध्ये प्रामुख्याने ३ प्रकारच्या गळतीचा समावेश होतो ,किंडी द्वारे होणारी फळगळती ,रोगामुळे होणारी फळगळती आणि आंतरिक बदल मुळे होणारी फळगळती
फळगळतीचे प्रकार | फळगळतीचे प्रमाण |
आंतरिक बदला मुळे | ७०-८०% |
किंडी द्वारे | ८ -१७% |
रोगमुळे | ८- १०% |
Fruit drop management:
आंतरिक बदल :
- (Orchard Fruit drop)झाडाला फळ धारणा झाल्यानंतर फळगळ प्रामुख्याने फळातील आंतरिक बदलामुळेच होते.फळाच्या वाढीच्या परिस्थिती मध्ये घेण्यात येणारी काळजी इथे अत्यंत महत्वाची असते.
- फळवाढत असताना जमिनीतील पाणी ,जीवन द्रवे,कर्बोदके यासाठी झाडांच्या मुळामध्ये स्पर्धा लागते. या वेळी उच्च तापमान आणि पाण्याची कमतरता असल्यास फळगळ सुरु होते
- या व्यतिरिक्त अन्न द्रव्याची कमी ,जमिनीत जास्त आद्रता ,नत्रा-कार्बनचे असंतुलन,रोग या कारणामुळे फळगळ होत असते
- ज्यावेळी तापमान कमी असते त्यावेळी फळगळ कमी असते व जास्त तापमानात फळगळती वाढते त्यामुळे वातावरणातील तापमान यास कारणीभूत असल्याचे आपल्या लक्षात येते
- फळबागांमध्ये पाण्याचा निचरा बरोबर नसल्याने जमिनीत पण साचण्याचे प्रमाण वाढते. झाडांच्या मुळा जवळ वाफसा तयार होत नसल्यामुळे रोगांचा प्रादुर्भाव वाढतो व त्यातून फळगळतीस सुरवात होते.
- वाफसा पद्धतीचा वापर करणे गरजेचे आहे.दुपारी १२ वाजताच्या झाडाच्या सावलीच्या ६ इंच बाहेर पाणी दिल्यास वाफसा तयार होतो ,वाफसा म्हणजे ५०% वाफ व ५०% हवा यांचे मिश्रण .
- (Orchard Fruit drop)जमिनीतून जीवन द्रवे घेण्याची क्रिया थांबल्यामुळे तंतुमय मुळे सोडण्यास सुरवात करतात.यातूनच फळगळतीस सुरवात होते याची लक्षणे विविध प्रकारची असतात जसे कि, पाने पिवळी पडण्यास सुरवात होते,पाने पूर्णपणे विकसित न होणे पानांचा आकार लहान असणे ,शेंड्याकडून फांद्या सुकत जाणे,फळगळ होणे.
- अति जास्त पाऊस झाल्यास मुळाना बुरशी लागण्याचे प्रमाण वाढते परिणामी मुळे कुजण्यास सुरवात होते.
- चुनखडी चे प्रमाण जमिनीत १०% पेक्षा जास्त असल्यास पाणी झिरपण्याची क्रिया हळू होते.
फळगळतीसाठी उपाययोजना:
१) झाडांना फळे लागण्याच्या आधी जमिनीची खोल मशागत करू नये.(Orchard Fruit drop)यावेळी जमिनीची मशागत केली असता जमीन पाणी धारण करून ठेवण्याची क्षमता वाढते त्यामुळे फळगळ होते.
२) झाडावर पालवी असणे आवश्यक आहे.यामुळे फळांची वाढ होत असताना पोषण मिळण्यास मदत होते.यासाठी आवश्कतेनुसार खताचा वापर करावा पानांची संख्या कमी असतानाच फवारणीचा चांगला परिणाम होतो.जीवामृतची फवारणी लाभदायक ठरेल.
३) सेंद्रिय पदार्थ : शेणखत ४०-५० किलो, निंबोळी ढेप वापरावी. ट्रायकोडर्मा १०० ग्राम शेणखतासोबत , सुडोमोनास १०० ग्राम ,यांचे एकत्रित मिश्रण करून झाडाच्या परीघामध्ये टाकावे
४) झाडांच्या फळाची चांगली वाढ होण्यासाठी पाण्याचा पुरवठा पुरेसा ठेवावा, अबिया बहारात पाण्याचा ताण झाडाला बसू नये याची काळजी घ्यावी .
५) अति जास्त पाऊस झाल्यास बागेत पाणी साचणार नाही याची कळजी घ्यावी उताराच्या दिशेने चर खोदणे हा देखील पाण्याचा निचरा व्यवस्थित होण्यासाठीचा उपाय आहे.
६) (Orchard Fruit drop) झाडाची गळलेली फळे ताबडतोब कंपोस्ट खड्यात टाकावी
७) फळे काढणी झाल्यानंतर झाडाची साल काढणे गरजेचे आहे. सल काढत असताना अवजाराचे निर्जंतुकीकरण करावे, सल काढल्यावर बुरशी नाशक फवारणी करावी.
८)फळबागेमध्ये आंतरिक पिक घ्यावे यामध्ये मुग, उडीद व तत्सम पिके घेतल्यास फळगळती कमी होण्यास मदत होते. कपाशी सारखी पिके घेण टाळावे.
९) सतत झालेल्या पावसाचे पाणी साचून असल्यास तणनाशकाचा वापर करू नये आद्रतायुक्त वातावरणातील फळगळतीसाठी हे नुकसानदायक आहे.
१०) वर्षातून कमीतकमी दोनदा चुना, मोरचूद व पाणी अनुक्रमे १:१:१० बोर्डोपेस्ट पावसाळ्याच्या आधी व नंतर लावणे अत्यंत महत्वाचे आहे.
११)Orchard Fruit drop फळगळती थांबवण्यासाठी झाडांवर आलेल्या रोगांचे लगेच व्यवस्थापन करणे गरजेचे आहे असे केल्यास फळबाग सशक्त त्याच बरोबर रोगमुक्त राहते.
किंडीमुळे झालेली फळगळतीवर उपाययोजना:
१) Orchard Fruit drop वेळी कोळा , सिट्रससिल्ला व रससोषक पतंग या किंडांन मुळे फळगळ होत असते,या फळगळीस सप्टेंबर -ऑक्टोबर मध्ये सुरवात होते.
२) झाडाला फुले येतअसताना सिट्रससिल्ला या किंडीचा जोर दिसू लागतो,तो थांबवण्यासाठी पुढील उपाय करावा:
(डायमेथोएट २ मिली + १ ली पाणी) या प्रमाणे महिन्यातून दोनदा पंधरा दिवसाच्या अंतराने फवारण्या कराव्या.
३) फळगळती जर रससोषक पतंगमुळे होत असल्यास विषारी आमिषे तयार करावीत त्या साठी पुढील उपाय करावा:
(मॅलेथिऑन २० ग्राम +२०० ग्राम गुळ + २ ली पाणी ) यांचे मिश्रण करून एक एक लिटर ची आमिषे तयार करावीत,हे मिश्रण २५ -३० झाडामध्ये एक बाटली या प्रमाणे ठेवावी.
४) फळमाशी चे सापळे तयार करावीत, तोडणीच्या दोन महिने आधी सापळे झाडांवर टाकून ठेवाव्यात.फळमाशीच्या नराणा आकर्षित याद्वारे करता येते. सापळे २५ प्रतीहेक्टर लावावेत
५) Orchard Fruit drop ओलसर गवतासोबत कडुलिंबच्या फांद्या पाने यांचा धूर बागेत सायंकाळच्या वेळी ७ – १० च्या दरम्यान केल्यास किडांचा प्रादुर्भाव आटोक्यात राहतो.
रोगांमुळे झालेली फळगळती:
१) मुळाना लागलेल्या बुरशीमुळे फळगळती होते यामध्ये प्रामुख्याने,कोलेटोट्रीकम, ग्लाईओस्टोरिऑईडस , अल्टरनेरिया सिट्री या बुरशी कारणीभूत असतात.यासाठी पुढील उपाय करावा:
(कार्बेन्डाझिम १ ग्राम +१ ली पाणी ) यांचे मिश्रण जुलै महिन्यापासून १ महिन्याच्या अंतराने ३ वेळा फवारणी करावी.
२) आंबिया बहराच्या फळझाडांसाठी (संत्रा,मोसंबी) १ किलो डीएपी व झिंक सल्फेट १५० ग्राम सुक्ष्म अन्नद्रव्याच्या मात्रा देणे गरजेचे आहे.
३)Orchard Fruit dropमध्ये महत्वाचे कारण,३- ४ दिवस सलग पावसामध्ये खंड पडल्यास पुढील उपाय करावे :
(GA-3 १.५ ग्राम + कॅल्शियम नायट्रेट १.५ किलो + स्ट्रप्टोसायक्लिन १५ ग्राम + १०० ली पाणी ) यांचे एकजीव मिश्रण करावे ,मिश्रण करताना घड्याळ काट्याचे दिशेने फिरवत औषध तयार करून फवारणी करावी.
महत्वाचे: वरील फवारणी होताच त्यानंतर १५ दिवसांनी पुढील फवारणी करावी :
(मोनोपोटॅशियम फॉस्फेट १.५ किलो + बोरिक ऍसिड ३०० ग्राम + NAA १.५ ग्राम + थायोफनेट मिथाइल १०० ग्राम + १०० ली पाणी ) यांचे एकजीव मिश्रण करावे ,मिश्रण करताना घड्याळ काट्याचे दिशेने फिरवत औषध तयार करून फवारणी करावी.
Orchard Fruit drop ची काळजी :
१) झाडांना ८ ते १० दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे ठिंबक सिंचनाची सोय येथे लाभदायक ठरते, पाणी प्रमाणात द्यावे.
२) पावसाळ्यात मुख्यता ऑगस्ट -सप्टेंबर मध्ये बागेत पाणी साचून राहते, पाण्याचा निचरा लवकरात लवकर करावा, दुहेरी रिंग पद्धतीने पाणी देणे फायद्याचे असते.
३) हेटा, शेवरा हि झाडे वारा अडवन्यास सक्षम असतात बागेच्या पश्चिम व दक्षिण देशेने सभोवताल ही झाडे लावल्यास फळाना इजा होण्यचा धोका कमी होतो.
४) सप्टेंबर-ऑक्टोबर आणि जानेवारी-फेब्रुवारी दरम्यान फळातील रस शोषण पतंगाचा जोर वाढतो,यावेळी अळीच्या खाद्य तनाचा नाश करणे गरजेचे असते,असे केल्यास पतंगाचा उपद्रव मंदावतो.
५) ओलसर गवतासोबत कडुलिंबच्या फांद्या पाने यांचा धूर बागेत करत राहणे आवश्यक आहे,धूर केल्यास फळानपासून पतंग दूर राहतात.