Natural Farming |नैसर्गिक शेती

Natural Farming In Marathi:

Natural farming: नमस्कार शेतकरी मित्रानो, शेती मधील वाढता रसायनाचा वापर हा नकळत आपल्या पुढील पिढ्यांच्या आरोग्याशी खेळणार आहे . भविष्यात आपल्याला याच्या गंभीर परिणामाला समोर जावे लागणार आहे.त्याच बरोबर जमिनीची सुपीकता जमिनीतील पाण्याची पातळी शेती मधील वाढत्या रसायनाच्या वापरामुळे खालावली जात आहे . पर्यावरण मंत्रालयाने याची वेळोवेळी दखल घेतली आहे .केंद्र सरकार व महाराष्ट्र शासन Natural farming नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकरी बांधवाना अनुदान देण्याचा विचार करत असल्याची माहिती केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहाण यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत सांगितली आहे. रसायन मुक्त अन्नधान्याचे उत्पादन व्हावे यासाठी कमी खर्चिक नैसर्गिक/सेंद्रिय शेती संबंधित संपूर्ण माहिती आपण या लेखात बघणार आहोत .

ड्रोन फवारणी

Natural Farming

नैसर्गिक शेती Natural farming करण्याचा आग्रह शासना कडून धरला जात आहे .रसायने आणि खताचा वापर वारंवार होत असल्यामुळे जमिनीची सुपीकता दिवसेंदिवस ढासळत चालली आहे .त्याचाच परिणाम उत्पादना बरोबर शेतीच्या उत्पादकतेवर होत असून जमीन नापीक होत चालली आहे.जमिनीचा पोत सुधारणे आता अत्यंत महत्वाचे झाले आहे म्हणूनच नैसर्गिक/सेंद्रिय शेती Natural farming करण्याचे आव्हन शासन कडून होत आहे .

  • रासायनिक खते व कीटक नाशकाच्या वापरामुळे सर्वात जास्त परिणाम हा जमिनीवर होत असतो काम्पोस्ट व शेणखताचा वापर अत्यंत कमी प्रमाणात झाल्यामुळे जमिनीमधील कार्बन ढासळले असून त्यामुळे जमिनीची सुपीकता कमी होऊन जमीन कडक होत आहे.
  • जमीन कडक झाल्यास जमिनीची पाणी आणि वायू धारण क्षमता कमी होते .सातत्याने होत असलेल्या कीटकनाशक व तणनाशकाच्या फवारणीमुळे जमिनीतील जीवाणू जसे कि, गांधूळ या सारखे पिक उपयोगी जीव नष्ट होतात नैसर्गिक शेती पद्धतीचा अवलंब केल्यास जमिनीतील कार्बन चे प्रमाण त्याचबरोबर जीवाणूचे प्रमाण वाढण्यास मदत होते .
  • * Visit Goverment official website

नैसर्गिक शेतीची संकल्पना व मुलतत्वे :

  • आरोग्य व पर्यावरण दोघांचा समतोल साधने .
  • जैवविविधते बरोबर एकात्मिक शेती पद्धती अवलंबणे .
  • जनावरांचा उपयोग शेती नियोजनामध्ये करणे .तसेच शेती व्यवस्थापनामध्ये जमिनीचे आरोग्य शाश्वत ठेवणे .
  • नवीन तंत्र्ध्यान व पारंपारिक पद्धतीच्या संगमातून अव्वल दर्ज्यचे अन्नधान्य उत्पादित करणे .
  • रासायनिक खाते व कीटक नाशकाचा वापर थांबवून जमिनीतील सेंद्रिय कार्बन चे प्रमाण वाढवून जमिनिची सुपीकता आरोग्य सुधारणे .
  • रसायनमुक्त ,पोषणयुक्त ,विषमुक्त सुरक्षित पिकमाल घेणे .
  • स्थानिक संसाधनाचा वापर करणे ,कमी भांडवल खर्चाची शेती करणे .

नैसर्गिक शेतीची गरज का ? :

  • जमिनीचा पोत खराब झाला असून सेंद्रिय कार्ब ०.०३ % . जल धारण क्षमता यात कमी असते .
  • पाण्यची पातळी खोलवर गेली आहे (६० -८० मी ).
  • पर्यावरणाला धोका निर्माण होत असून त्याचे परिणाम वातावरणात दिसू लागले आहे .
  • शेतीची उत्पादकता खालावत चालली आहे . राज्याच्या तुलनेत महाराष्ट्र सर्वात खाली .
  • रासायनिक कीटकनाशकाचा अति वापर झाला आहे यात महाराष्ट्र सर्वात अव्वल आहे .
  • पिकांची विविधता अत्यंत कमी झाली आहे .
  • कमी / जास्त पावसाचा पिकांना फटका बसत आहे .

नैसर्गिक शेती पद्धती :

आपल्या सभोवतालील निसर्गामध्ये किवा जंगला मधील कुठलेही झाडाकडे बघितले तर आपल्यला असे लक्षात येईल कि झाडाच्या पानांमध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता आपल्याला दिसून येत नाही ह्याचा अर्थ जमिनी मध्ये झाडांच्या पिकांच्या वाढीसाठी लागणारी सर्व अन्नद्रवे संतृप्त प्रमाणात आहे .नुकत्याच झालेल्या संशोधनानुसार , जमिनीच्या पृष्ठभागापासून जसे जसे आपण खोल जातो तसेतसे अन्नद्रवे चे प्रमाण वाढत जाते .निसर्ग मध्ये आपल्याला अशी रचना पाहायला मिळते .

अन्नद्रव निर्मितीचे चार प्रकार :

१) कुजण्यातून निर्माण होणारे अन्नद्रवे .

२) केशाकर्षण शक्ती प्रक्रियेतून निर्माण होणारे अन्नद्रवे .

३) चक्रीवादळाने निर्माण होणारे अन्नद्रवे.

४) देशी गांडूळाच्या हालचालीतून निर्माण होणारे अन्नद्रवे .

नैसर्गिक शेती साठी शेतातून निघणारा सेंद्रिय पालापाचोळा ,काडीकचरा ,शेतातील मातीत परत टाकावा रोटावेहटर ने तो बारीक केल्यास मातीत मिसळवता येतो .कम्पोस्ट खात तयार करणे हाही एक उत्तम पर्याय आहे . कम्पोस्ट खात केल्यास त्यचे परिणाम लवकर दिसू लागतात .

सूक्ष्मपर्यावरण ची गरज : सूक्ष्मपर्यावरणनात काम करणारा जीव म्हणजे गांडूळ,जमिनीच्या सुपीकतेसाठी निसर्ग बहरण्यासाठी जंगलाची निर्मिती होण्यासाठी गांडूळचे सर्वात महत्वाचे काम आहे.पृथ्वीवर गांडुळे नसती तर जंगले उभी झाली नसती .जमिनीच्या पृष्ठभागापासून ते खोलपर्यंत गांडूळ सुपीक माती खाऊन विष्ठेच्या रुपात अन्नद्रवे गांडूळ निर्माण करत असतात .नैसर्गिक शेती करत असताना त्याचे मोलाचे योगदान आहे गांडूळाचे हेच कार्य सूक्ष्मपर्यावरण निर्माण करते .

Natural Farming

सूक्ष्मपर्यावरण उभे करण्यसाठी यंत्रणा तयार करावी लागेल त्या पुढील प्रमाणे:

  • तापमान
  • आद्रता
  • अंधार
  • उब

वाफसा :पिकांच्या मुळाना पाणी हवे हि संकल्पना चुकीची आहे. जमिनीत असणारी ५०% पाण्याची वाफ व ५०% हवा ह्यांच्या मिश्रणास वाफसा म्हणतात .पाण्याचा वापर जास्त केल्यास मुळाना फायटोपोथोरो बुरशी लागते त्यामुळे मुळे सडतात .म्हणूनच पिकांच्या मुळाना वाफसा पाहिजे असतो .

वाफसा तयार कसा करायचा :कोणत्याही झाडाची दुपारी बारा वाजता पडणारी सावली त्या सावलीच्या शेवटच्या टोकावर वाफसा आणि अन्न घेणारी मुळे असतात त्या मुळाच्या ६ इंच बाहेर पाणी दिल्यास मुळे स्वतः हवे तेव्हा वाफसा घेतात .

कसे कराल :यावर उपाय कराचा झाल्यास झाडाच्या सावली पासून ते खोडा पर्यंत उतार काढला तर पावसाचे व सिंचनाचे पाणी ताबडतोब बाहेर निघेल व मुळ्या सुरक्षित राहतात .

सावलीच्या ६ इंच बाहेर सरी काढल्यास त्यातून सिंचनाचे पाणी दिल्यास फळझाडावर मर किवा डीक्या रोग येत नाही असे केल्यास मुळा जवळ वाफसा तयार होतो .


नैसर्गिक शेती मध्ये पिकांची निवड:

पारंपारिक शेती करत असताना सतत एकाच पद्धतीचे पिक घेतल्याने जमीन कुमकुवत बनली आहे .रासायनिक खताच्या वापरामुळे जमिनीची मशागत करून सुपीक बनवणे गरजेचे आहे. प्रत्येक हंगामात शेतकरी कोणते पिक घ्याचे आहे याचे नियोजन करत असतो यात पिकांचा बाजारभाव, पावसाची सुरवात उपलब्ध बियाणे यांचा समावेश होतो .

  • नैसर्गिक शेती(Natural farming) करत असताना मिश्र पिकांची निवड केली जाते .नगदी पिकांसोबत हिरवाचारा पिक तूर,मुग,उडीद ,तीळ ह्यंच्या काही तास पेरणे आवश्यक आहे .
  • पिकांच्या जागेची फेरपालट करणे गरजेचे असते ह्यातून पिकांना विविधांगी अन्नद्रवे मिळत असतात .
  • आपण घेत आलेल्या वाणाचे बियाणे असल्यास ते पेरावे नसेल तर त्याची व्यवस्था गावातील शेतकऱ्याकडून करावी .पारंपारिक वान व मिश्र पिकांमुळे कीड व रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो .

बियाणे :

  • पारंपारिक वानाचे बियाणे वापरावीत,बियाणे सशक्त असणे आवश्यक आहे .बियाणे चाळणी लाऊन निवडून घ्यावे .
  • निवडलेल्या बियाणांना पेरणीच्या १० – १२ दिवस आधी १ लिटर गोमुत्र , ५० ग्राम गुळ, ५० ग्राम हिंगाचे एकजीव मिश्रण करून घ्या आणि ते बियांनावर शिपडून बियाणे सावलीत वाळू द्या .ह्यामुळे बियाणांची उगवण क्षमता वाढते व ते सशक्त होतात असे केल्यास जमिनीतील किडे, बुरशीपासून बियाणांचे संरक्षण होते .
  • गावराणी बियाणे वापरणे अतिशय महत्वाचे आहे ते नसेल तर सुधारित बियाणे वापरू शकता पण चुकुनही बीटी बियाणे वापरू नये .

पेरणी :

  • पाऊस झाल्यानंतर जमिनीचा ओलावा तपासावा साधारणपणे १०० ते ११० मिलीलीटर पाऊस पेरणी साठी गरजेचा असतो .
  • जमिनीत ६ इंच पर्यंत ओलावा असेल तर पेरणी करू शकता जास्त दाट पेरणी करू नये .
  • जास्त दाट पेरणी करू नये .रोपांना पोषक वातावरण निर्माण होण्यासाठी आवश्यक जागा व सूर्यप्रकाश मिळणे गरजेचे आहे .
  • Natural farming साठी वाफसा सुरळीत निर्माण होईल या पद्धतीने रोपांची पेरणी करावी .
  • बीज उत्पादक कंपन्या आपला खप जास्त व्हावा यासाठी नेहमीच जास्त बियाणे पेरण्याचा सल्ला देतात परंतु आपण आवश्यक तेवढेच बियाणे पेरावे .

खते :

  • नैसर्गिक शेती पद्धतीत खाते हे देखील मोलाचा घटक आहे पण ते कोणती असली पाहिजे यावर चर्चा करणे अतिशय महत्वाचे आहे .
  • खाता मधूनच जैविक क्रिया वाढवणे व सेंद्रिय कणांचे प्रमाण जास्तीत जास्त करणे हेच आपले एकमेव ध्येय असले पाहिजे .
  • खतांचा योग्य वापर झाल्यास जमीन भुसभुशीत होते व सुपीकता टिकून राहते ,एकदा का जमिनीचा पोत तयार झाला कि नंतर खतांची आवश्यकता लागणार नाही

नैसर्गिक शेतीची उत्पादकता कशी वाढवाल:

  • शेतकरी बांधवांनी नैसर्गिक शेती पद्धतीची प्रक्रिया पूर्णपणे अभ्यासात्मक ठेवणे गरजेचे आहे .
  • अशा नैसर्गिक शेती (Natural Farming) वापर केल्यास जमिनीची पाणी धारण क्षमता वाढते त्याच बरोबर पिकांची पाण्याशिवाय तहान सहन करण्यची क्षमता देखील वाढते .
  • प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे झाडाची पाने अन्न तयार करत असतात ते अन्न झाडे आपल्या खोडामध्ये साठून ठेवतात .
  • खोडामध्ये १०० किलो अन्नाची साठवणूक तयार झाली असेल तर त्यातून आपल्याला ३३ किलो धान्याचे उत्पादन मिळते .त्याच प्रमाणे फळासाठी ५० किलो पर्यंत उत्पादन घेता येते .
  • खोडा मध्ये जितके जास्त अन्न साठवले जाईल तितकीच उत्पादनात वाढ होत असते . झाडाच्या पानांनी तयार केलेली अन्न झाड बुडात साठवत असते म्हणूनच खोडाचा घेरा मोठा ठेवणे आवशयक आहे .
  • खोडाचा घेरा कमी असल्यास अन्न साठवणुकीची प्रक्रिया मंदावते व त्याचा थेट परिणाम उत्पादनावर होत असतो.
  • खोडाचा आकार वाढवण्यासाठी मुळांचा आकार वाढवणे आवशयक आहे .मुळांचा आकार तेव्हाच वाढतो जेव्हा मुळांची लांबी अधिक असते , मुळाच्या लांबी कडे प्रामुख्याने लक्ष द्यावे .
  • मुळांची लांबी तेव्हाच वाढते ज्यावेळी मुळांन पासून पाणी दूर दूर नेल्या जाते म्हणूनच आपल्याला पाणी मुळांन पासून दूर ठेवणे आवश्यक आहे.

तननियंत्रण :

१ )तन नियंत्रणासाठी वापर करणे टाळा आणि डवरणी आणि निंदन करून तन काढल्यास ,तनाचा त्रास हळू हळू नाहीसा होतो .

२)नैसर्गिक शेतीत असे केल्यास तन पूर्णपणे नाहीसे होते .

नैसर्गिक संसाधने :

१) सूर्य प्रकाश मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे (सौर उर्जा )

२) पृथ्वी वरील वातावरणात ७८% नायट्रोजन आहे झाडांसाठी इंधनाचे काम करतो .

३) वातावरणात आद्रता ७० ते १०० पर्यंत असते .

४) नैसर्गिक शेती मध्ये वनस्पतीची वाढ हि मुख्यत सुश्म जीवाणू व गांडूळ पासून होत असते . आपल्या शेतीत यांच्या वाढीवर विशेष लक्ष द्यावे .


कास धरा नैसर्गिक शेतीचे ,ते जपेल आरोग्य मातीचे

शेतकरी बांधवानो , नैसर्गिक शेतीची संपूर्ण माहिती एका लेखात सांगणे शक्य नाही , अशीच महत्वपूर्ण माहितीसाठी परत एकदा नक्की भेट द्या

WebsiteLink

WhatsApp Group Link